∆एमपी : देवलान येते तीन दलितांचे हत्याकांड

मध्यप्रदेश : दमोहमध्ये तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली. दलित कुटुंबातील तीन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली, जिल्हाधिकारी एस कृष्ण चेतन्या आणि एसपी डीआर तेनिवार यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. सुरक्षेच्या दृष्टीने गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ही घटना देवरान गावातील आहे. या ठिकाणी एका महिलेच्या विनयभंगावरून पटेल आणि अहिवाल कुटुंबात वाद झाला. हे प्रकरण इतके चिघळले की मंगळवारी दलित कुटुंबातील काही लोकांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात विनयभंगाचा आरोपी मानक अहिवाल (30), त्याचे वडील घमदी अहिवाल (60 वर्षे) आणि आई राजप्यारी (58 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील आणखी एका सदस्यालाही गोळी लागली असून, त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान पूर्ण देशात दलितांच्या हत्या होत आहे. दलित या देशात या रोज मरत आहे. केंद्र, राज्य सरकारने ठोस पावलं उचलावी आणि दलित अत्याचार विरोधात भूमिका घ्यावी. गेल्या सात वर्षांत एकदाही दलित अत्याचारावर कुणीच बोलले नाही. दलितांच्या हत्या घडवणारे कायद्याला का घाबरत नाहीत जणू काही पोलीस यंत्रणा त्यांची जावई आहे अशीच प्रक्रिया सध्या स्थितीत घडल्या. आहेत. ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करत आहे. तात्काळ प्रकरण फास्ट ट्रॅक मधे चालवावे आणि आरोपींना फाशी देऊन देशाला मोठा संदेश देण्याची आजची काळाची गरज आहे. तात्काळ व्यवस्थेने भूमिका घ्यावी अशी ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी आहे.