राजकीय

सत्ता होती तेव्हा पुरंदरेच्या पुस्तकावर बंदी अन् महाराष्ट्र भूषण पुरस्कार मागे का घेतला नाही?

सत्ता होती तेव्हा पुरंदरेच्या पुस्तकावर बंदी अन् महाराष्ट्र भूषण पुरस्कार मागे का घेतला नाही? याच उत्तर शरद पवारांनी द्यावे अशी भूमिका दिपक केदार यांनी मांडली!
सत्ता गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येणारे नेते म्हणजे शरद पवार आहेत.
बाबा पुरंदरेनी छत्रपति शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण केले, हे जगजाहीर असताना जेंव्हा शरद पवार सत्तेत आले, तेव्हा त्यांनी बाबा पुरंदरेला भाजपच्या सत्तेने दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत का घेतला नाही. बाबा पुरंदरे नी लिहिलेला विद्रूप विटंबना असलेला इतिहास त्या पुस्तकांवर बंदी का आणली नाही?
महाविकास आघाडीची सत्ता असताना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सत्ता आहे ते पुरस्कार मागे घ्या व त्यांच्या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली होती. सत्ता गेल्यावर छत्रपति शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची आठवण येते हे दुर्दैव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जेव्हा शरद पवारांना जाणता राजा म्हणत होते तेंव्हा शरद पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना का थांबवलं नाही?
आंबेडकरवादी समुहामुळेच महाराष्ट्रातील महापुरुषांचे अस्तित्व टिकून आहे असे मत दिपक केदार यांनी व्यक्त केले आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!