संघर्ष…

जो माणुस शुन्यातुन विश्व निर्माण करतो त्यालाच संघर्षाची किंमत कळते,समग्र महाराष्ट्रात फुले, शाहु, आंबेडकराच्या विचारधारेवर चालतो ना त्याला संघर्ष करण्याची भिती कधीच नसते.!
कारण थोर महापुरुषांचे विचार हे ज्वलंत आहेत, जो पर्यत हे विश्व आहे तो पर्यत यांचे विचार हे अजरामर असतील आणि राहातील.!
आंबेडकरी चळवळीमध्ये लांखो तरुणांने आयुष्य पणाला लावले,उध्वस्त झाले,स्वतःला संपवुन घेतलं पण विचार धारेशी कधी तडजोड केली नाही.!
अन्याय अत्याचार हे ऐकुन ऐकुन मनाला फार वेदना होतात,तरीही मनुवाद संपता संपत नाही. उलट जातीय दोषांच प्रमाण वाढत आहे पण थांबत नाही.!
हा वर्तमान आहे आज शिक्षण घेवुन हि लोक अडाणी सारखं वागत आहे हे सर्वात मोठं दुर्दवं आहे.!
राजकारणांची घिन येत आहे आता बौध्दांना सत्तेवर घेतलं जात नाही.! मानवतेसाठी मानसिकता बदलत नाही,कुञ्या मांजरासारखी हलत झाली आहे बहुजन समाजाची, खेडयापाडयात आजही दलित गुलाम आहे.!
हि गुलामी आजुन संपली नाही. बिर्टीश काळात हे सगळं होतं आणि आजही तेच आहे फक्त देखावा दुसरा आहे.!
न्यायाची परिभाषा राहिली नाही,हक्क मागत येत नाही.
अधिकार काय आसतो ते ठाऊक नाही, सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय, क्रांती पेटली नाही,बहुजन समाजात एकता नाही. अठरापगड जातीवर 75 वर्षापासून शासन करणाऱ्या मनुवादा ओळखता येत नाही.! भंयान परिस्थिती सामोरी जावं लागतं आहे.
महाराष्ट्रात परिवर्तन होत नाही,परिवर्तनांची दिशा समजत नाही,माता जिजाऊ,माता रमाई,माता सविञीई यांच्या लेकीचं संरक्षण होत नाही.!
गिधडासारखी मनुस्मृती पेरली जाते.बहुजनांतला एकोपा तोडला जातो.बहुजन समाजातील लांखो विचारधारेतील कार्यकर्ते प्रबोधन करुन बहुजन समाजाला फुले, शाहु, आंबेडकरांची, विचारधारेचा संदेश देत मरुन गेली. तरीही बहुजन समाज आमचा जागा होत नाही.!
न्यायसाठी आंबेडकरी समाज पुढे आसतो,तो कोणत्याही जातीचा असो जात कधी बघितली नाही, पण मानवता म्हणुन त्याला वाचविण्याचा काम आज पर्यत आंबेडकरी
समाज करीत आला आहे.!
बहुजन समाजासाठी आंबेडकर समाज रस्त्यावर आला अंगावर गुन्हे घेतलं,एवढचं नाहीतर वेळ आल्यावर स्वतःची, आहुती देतो. तरीही दलित, मुस्लिम, आदिवासी, समग्र बहुजनांला हे समजत नाही.!
किती अन्याय अत्याचार सहन करायचं,किती गोळया खायंचा, किती जीवांचीबाजी लावयांची बसं झालं ना आता हे, आतातरी हा खेळ थांबवा, आतातरी एक व्हा.!
हि एक शेवटची संधी आहे आपणाला गुलामीपासुन वाचा. परत महापुरुष जन्माला येणार नाहीत, लोकशाही धोक्यात आहे, आता तरी जागे व्हा! मत विकु नका!!
चौथ्या पर्वाचे शिलेदार आदरणीय दिपकजी केदार साहेब यांच्या माध्यमातून पँथर उदयास आली आहे.यांना साथ द्या,यांचे हात बळकट करा आणि पुन्हा पेटुन उठा या महाराष्ट्राच्या सत्तेची दिशा बदला वेळ गेली नाही.
संविधान जिंदाबाद.!
-कुणालभैय्या इंगळे
जिल्हाध्यक्ष,ऑल इंडिया पँथर सेना
9403669007