रक्तातून क्रांती, जमिनीतून ज्वाला…

रक्तातून क्रांती
जमिनीतून ज्वाला
सामाजिक समतेचा
नवा लढा जिंकला
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
नावाची एक कमान
रंगवायची होती एका क्षणात
जातीयवादी, मनुवादी
धर्म कर्मठतावादी
येते सत्ता सोठ्या उभा करून
आमच्या कपाळावर मारत होती
तिने 17 वर्ष लावले
एक कमान रंगवायला
सम्राट अशोकांचा देश
गौतम बुद्धांचा देश
फुले, शाहु, बाबासाहेबांचा देश
तरी गुलाम आम्ही येते
गुलामी नाकरण्या
सामाजिक समतेचा
लढण्या लढा
पेटला पुन्हा एकदा
1818 चा यौद्धा
आता तो पँथर होता
आग लावत निघाला होता
शत्रूंची बलाढ्य ताकद
शत्रूंची अफाट क्षमता
बेभान होऊन
जयभीम म्हणत पँथर लढला होता
प्रश्न विचारत होता
देश आमचा
संविधान लिहिणारा बाप आमचा
कुठं आग लागते तुमच्या?
का देत नाही तुम्ही कमानीला नाव ?
का हिसकावून घेता हक्क आमचा
लढा फक्त कमानीचा नव्हता
आमच्या आया बहीणीना नासवलं जायचं
आमच्या जयंतीत दगडफेक
डोकी फुटलेली रक्तबंबाळ भीमसैनिक
पंगतीत, पारावर आमच्या कंबरेत लाथा
फुटक्या कप बश्या, शिवता शिवत
भाकरीवर गुलामी, बैलासारखं जीणं आमचं
हत्याकांड, अत्याचार नित्याच म्हडं
त्याला कोण रडं अशी अवस्था आमची
अति झालं तिथं माती केलं
जेव्हा बापाचं अस्तित्व
ओळ्खचं पुसायला निघाली
ही मुर्दाड व्यवस्था
तेंव्हा पेटून उठला भीमसैनिक
रक्ताची पर्वा ना आगीची पर्वा
कुणी रक्तबंबाळ झाला
कुणी राख झाला
सांग पोच्या जयभीम म्हणशील का?
म्हणत पोचिराम मारून टाकला
पोचिराम दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लढत होता
जयभीम जयभीम जयभीम
म्हणत झुंज देत होता
घरा दारांची राखरांगोळी
जिकडे तिकडे संघर्ष पेटलेला
त्या आगीतून क्रांतीची ज्वाला भडकत होती
सरकार थयथयाट करत होती
ज्यांच्यामुळे खुर्च्या मिळाल्या
त्यांच्या नावाला विरोध
करणाऱ्या बारा बोड्याच्या औलदीने
एका क्षणाचे काम 17 वर्ष लांबवले
दलितांच्या टाळूवरच लोणी खाल्लं
समर्थक विरोधी असे संघर्ष पेटवले
कित्येक गौतम वाघमारे पेटवले
राख झाली माणसांची
तरी घाम फुटला नाही कर्मठ गोठ्याला
खादीच्या कपड्यात जणू
आधुनिक मनु उभा होता
नामन्तराचा त्यानं खेळ मांडला
आम्हीही जयभीमची औलाद
नवा इतिहासच घडवला…
देश स्वतंत्र झालाय
संविधान आलंय
पण जातीयता तशीच आहे
तिचा माज असलेल्या
वैदिकांच्या गुलामांना
त्याचा अतीच माज आहे
जेंव्हा पँथर डरकाळला
तेव्हा माज मस्ती जिरवला
ही कमान रक्ताच्या गाठींवर उभा आहे
ही कमान क्रांतिकरकांच्या राखेवर उभा आहे
ही कमान नाही
हे अस्तित्व आहे
आम्हाला पुन्हा नवं स्वतंत्र देणारं
आम्हाला जातीयतेतून मुक्त करणारं
त्या क्रांतीच्या बळावर
गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे
शेकडो शहिदानी निर्माण केलेला
गावा गावात तो स्वाभिमान जिवन्त आहे
दरारा तेवढाच
निर्भिड बाणा तेवढाच
सफर झालेला हरेक माणूस आहे
आता पेटत असतो आम्ही
त्यांचा वारसा पुढे करून
आता लढत असतो आम्ही
त्यांच्या शौर्याची प्रेरणा घेऊन
ते नसते तर नसतं मिळालं
नवं स्वतंत्र
नसती घाबरली ही मसातडलेली व्यवस्था
टाईट झालेले सोठे
कर्मठ रंगीबेरंगी दगडगोटे
पडत राहिले असते आमच्या डोक्यात
म्हणून
ही नुसती कमान नाही
माणूस म्हणून जगणं देणारी
आमचं अस्तित्व वाचवणारी
हे क्रांतीचं प्रतीक
कुचलेल्यांची स्वाभिमानी ढाल आहे
आक्रमक संघर्षाला सलाम
वजरमूठ एकजुटीच्या संघर्षाला सलाम
ज्यानं 17 वर्ष भिजत घोंगडं ठेऊन
शहिदांच्या जळलेल्या निखार्यावर
शेकत बसलेल्या सोठ्याला सुद्धा सलाम
कमानीवर मीच नाव दिलं
म्हणून मिरवणाऱ्या निर्दयी
व्यवस्थेतील मोहरक्याला सलाम
एक क्षण 17 वर्षाचा दाखवला
त्यालाही सलाम
लढणाऱ्या प्रत्येक भीम यौध्याला सलाम!
नामन्तर केलंच नाही अखेर
कुणी पिठावर गेलं
कुणी घरं जाळत गेलं
कुणी लुटत गेलं
कुणी पेटवत गेलं
पेटलेल्या आगीतून
उभा राहिली त्या निळ्या क्रांतीला सलाम.
शहिदांच्या लढयाला जयभीम…
- दिपक केदार