अग्रलेख

बागेश्वर कसला हा बागेभाई असले लाखों मेंटल हॉस्पिटल मध्ये मिळतील!

पुणे : सर्व समाजमाध्यमात 24 तास बागेश्र्वर नामक ढोंगी दिसत आहे आणि त्याला श्याम मानव नामक अंधश्रद्धा निर्मूलन अध्यक्ष चॅलेंज करताना दिसत आहे. चमत्कार दाखवल्यास ते या ढोंगी तरुणाला 30 लाख रुपये देणार आहेत. श्याम मानव यांचं चॅलेंज आहे की तू दाखव चमत्कार अन् त्या बागेभाईच मत आहे की हवा आणि पाणी जसे दिसत नाही तसे आमचे चमत्कार आहेत. या चमत्काराचा संबंध त्याने सनातन धर्म, हनुमान सोबत जोडून हे हिंदू धर्मावरील संकट जाहीर केले आहे.

मीडिया वर हसू येतं मिडीयाला आणखी मोठं मोठे चमत्कार हवे असतील तर त्यांनी मेंटल हॉस्पिटल मध्ये जावे तिथे अनेक मंडळी असेच चमत्कार दाखवत असतात. श्याम मानव ने सुद्धा या मेंटल हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी. स्वतः ला अफाट विद्वान समजणारे मानव सुद्धा मनोरुग्णाला चॅलेंज करतात तेव्हा हसावं वाटतं. मीडिया 24 तास या मानसिक टपोरी पोराच्या आजूबाजूला फिरतात त्याची मुलाखत लावतात तेंव्हा या देशात काय सुरू आहे अशा प्रश्न पडायला लागतो. बातमी कडे बातमी नाही तर लोक आता असे विषय बघून थेटर मधे जाणे बंद करत आहेत आणि बातमी सहित फिल्म मिडियात बघत आहेत.

जेव्हां गौतम बुद्धांनी या जगात ईश्वर नावाची कल्पना नाही, चमत्कार नाही तर येते विज्ञान आहे हे सिद्ध केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून शोषणकारी चमत्कारी भोंदूगिरी, थोतांड व्यवस्था उद्धवस्त केली. महात्मा फुलेनी शेतकऱ्यांचा आसूड लिहून भोंदुंचा पोटातून जाणारा धर्माचा रस्ता एक्सपोज केला. त्यानंतरही पुन्हा आज हे असे बावळट निर्माण झालेत ते मानसिक आजारी कामचुकार आहेत. गरिबी, निराशा, बेरोजगारी याचा हे फायदा घेतात आणि अमुक धर्म तमुक देव या नावाखाली लुटमार सुरू करतात. हतबल झालेला अशा लोकांचा आधार घेतो आणि बळी जातो.

बागेभाई नामक हे पोरगं एक टपोरी आहे. त्यांचं वागणं, त्याचे हावभाव, त्याचे विचार हे सगळे मनोरुग्णाचे संकेत आहेत. तात्काळ आरोग्य विभागाने दखल घेऊन अशा प्रवृत्तीला मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करून यांनी केलेली लुटमार 420 घोषित करून जेलमध्ये टाकले पाहिजे. आणि यासाठी श्याम मानव ने कोर्टाचा आधार घेतला पाहिजे. मीडिया ट्रायल हा पर्याय नाही तर हा थोतांड थेरीचा प्रचार आहे.

माझं मत ठाम आहे, “अंधश्रद्धा सिद्ध करा म्हणणारे सुद्धा अंधश्रद्धाळू असतात”. आपला विचार ठाम असला पाहिजे. बुद्धांनी जाहीर केले ईश्वर नाही तर नाहीच त्यांनी सिद्ध करा म्हटले नाहीत.

बागेभाईला जेलमध्ये टाकले पाहिजे. मीडिया राहुल गांधी च्या यात्रेला दाखवत नाही. भारत जोडो जोरात सुरू आहे, त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी बागेभाई निर्माण केले जातात. फॅब्रिक मुद्दा वाजवला जातो आणि मूळ प्रश्न प्रलंबित ठेवले जातात. त्यातूनच हा खेळ सुरू झाला आहे. बीबीसी ने 2002 गुजरात दंगली संदर्भात आणलेली डॉक्युमेंट्री नरेंद्र मोदींना कतघर्यात उभा करणारी आहे ते दाबण्यासाठी मीडियात हा भोंदू चालवला आहे.

आज एक सैनिक भारतीय फौजी शहीद झाला, त्याची साधी न्यूज सुद्धा कुणीही दाखवली नाही. बागेभाई प्रकरणातून मिडीयाला वेळ नाही.

2013 ला संत शोभन सरकार नामक भोंदू संताला एक स्वप्न पडले होते की डोंडया खेडा गावात एक हजार टन सोने जमिनी खाली असल्याचे स्वप्न या भोंदू संतला पडले ते स्वप्न दस्तुर खुद्द मनमोहन सिंग यांनी गांभीर्याने घेतले.वैधानिक आधार घेऊन पुरातत्व विभागाने येते सोन नाही हे खोदून काढण्या आधीच सांगितले होते. पण अंधश्रद्धा सिद्ध करा म्हणनारे मानवराव सारखे महाभाग असतातच.

मिदियात 24 तास शोभन सरकार नामक संत, फावडे घेऊन घटनास्थळी हजारों लोकांची गर्दी, गर्दीला आवरण्यासाठी पीएसी जवान तैनात केले. उत्खनन सुरू झाली आधीच अब्दुल कलाम यांनी हे स्वप्न नाकारले होते. वैधनानिक यंत्राने काही नसल्याचे जाहीर केले तरी भावना, अंधश्रद्धा या आधारावर उत्खनन सुरू झाले.

अखेर निराशा वाट्याला आली, जमिनीत दगड माती पलीकडे काही सापडले नाही. तेंव्हा या भोंदू संतावर विश्वास ठेवणारे अती मुर्खाच्या गिनतीत गणले केले. सरळ होतं की कानपूर आश्रमात झोपलेल्या संताला उजैन येथील एका खेडे गावात हजारो टन सोने असल्याचे स्वप्न कसे काय पडू शकते आणि स्वप्नावर सरकार मीडिया विश्वास कशी काय ठेऊ शकते? तेव्हाही आठवतय 8 दिवस मिडियात शोभन सरकार नामक भोंदू संत होता आणि त्याच्या तालावर नाचणारे मीडिया आणि सरकार होती आज पुन्हा तेच चित्र आहे. चिट्टीत काय लिहिलंय हे न बघता सांगणारा बागेभाई अवतरला आहे. मीडिया वेडी झाली, सिद्ध करा म्हणणारे अती हुशार झालेत. आपण 2013 च्या घटनेतून काय शिकलो? या महामुर्खांची जागा थेट जेलमधील मेंटल हॉस्पिटल मध्ये आहे. ऐतखाऊ भावनांना आता थारा देणे बंद झाले पाहिजे. या भावनांनी देशाला फुटीच्या उंबरठ्यावर उभा केलं आहे. हे असले भोंदू आठ वर्षांपूर्वी कुठेच नव्हते आता अचानक हे मेंढर आलेत कुठून? शोभन सरकार संत आणि हे बुजगावणे एकच आहे!

  • दिपक केदार

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!