अग्रलेख

महत्वाकांक्षी पुतण्यांमुळे बीडचे राजकीय अस्तित्व संपले!

बीड : क्षीरसागर, मुंडे कुटुंब म्हणजे बीड जिल्ह्याच्या राजकारणाची ओळख होती. या दोन्ही आडनावाने गेली तीस ते चाळीस वर्ष येते राजकीय सत्ता टिकवली. केसर काकू क्षीरसागर तर संदीप क्षीरसागर असा हा राजकीय वारसा आहे. केसर काकूंच्या अनेक राजकीय इतिहास आहे. त्यांच्या बंगल्यात आड असल्याची चर्चा असते, पैसे छपायची मशिन बद्दल चर्चा असते.

रवि क्षीरसागर या त्यांच्या चिरंजीवांचा आक्रमक इतिहास सुद्धा जगजाहीर आहे. असं असताना त्यांचा बंगला जाळला कशा हा खुप मोठा प्रश्न जिल्ह्याला पडला आहे. अखेर कसा जळला याची खाजगीत लोक वेगळीच चर्चा करत आहेत.

काहीही असले तरी राजकारणासाठी त्यांचा वापर झालेला आहे. त्यांच्या बंगल्यावरील हल्ला हा नेमका कुणाचा राजकीय फायद्यासाठी आहे हे आता झाकले गेलेले नाही. सहज ट्रॅप मध्ये अडकलेलं हे कुटुंब आहे. राजकारणात आपलं अस्तित्वच संपेल एवढी टोकाची भूमिका कुणी घेतली नाही पाहिजे.

जाळपोळ बारामतीत कुठेही झालेली नाही. बारामतीच्या नेत्यांच्या आमदाराच्या बीड मधील घरी मात्र ही जाळपोळ झाली. त्यांनी त्यांचं काहीही जाळले नाही, त्यांचे शांततेचे शहर अबाधित आहे. पश्चिम महाराष्ट्र कधीही दंगलीचे केंद्र राहिलेला नाही. सगळ्या दंगली राज्याच्या राजकारणासाठी मराठवाड्यात झाल्या आणि आजही तेच झालं.

ज्यानं या ट्रॅप ला मदत केली ते पुरते राजकारणातून उडालेले आहेत. आता लोक हे ही म्हणतील जे स्वतःच घर वाचवू शकले नाहीत ते जिल्हा अन् आमचं घर काय वाचविणार. शेकडो तरुणांना उचलून जेलमध्ये टाकलंय, त्यांचे कुटुंबीय आक्रोश करणार आणि यातून बीड च्या प्रस्तापित राजकारण्यांचे अस्तित्व उद्ध्वस्त होणार.

सगळे राजकिय पक्ष मुंबई, पश्चिम महाराष्ट्र भागातील मराठवाडा राजकीय पक्ष निर्माण करू शकलेला नाही त्यामुळे सातत्याने येते फोडा फोडा करून आपले पक्ष मजबूत करण्याची खेळी येते सुरू राहिलेली आहे. पुतणे फोडून अधिराज्य गाजवणाऱ्या नेत्यांनी आता पुतण्यासहित त्यांचे घरच फोडून टाकले आहे. आता यावर चिंतन कोण करणार?

पुतणे महत्वाकांक्षी झाले अन् राजकीय अस्तित्व संपवून बसले. आज जर काका फळी अस्तित्वात असती तर या ट्रॅप मध्ये ते फसले नसते. अर्ध्या हळकुंडात सगळे पुतणे फसून गेले. आता प्रश्न हा आहे की यापुढे तरी बीड घराण्याच्या राजकारणातून मुक्त होणार आहे की नाही? नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी गुलामी करायची की नवनिर्मिती करायची हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे.

चला भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. बीड जिल्ह्यातील नव्या चेहऱ्यानी बिडच राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी पुढे यावे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!