चळवळ

अभूतपूर्व निळा जनउठाव महामोर्चा राज्यभर या मोर्चाची चर्चा

औरंगाबाद : निळा जनउठाव महामोर्चा हा अभूतपूर्व असा संपन्न झाला. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये सकाळपासून संघर्ष सुरू होता. ऑल इंडिया पँथर सेना 30 ऑक्टोबर 2022 ला क्रांती चौक औरंगाबाद ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा काढणार असे परवानगी साठीचे पत्रक औरंगाबाद कमिश्नर ऑफिसला ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष बंटीदादा सदाशिवे यांनी दिले. तब्बल 15 दिवस आधी हे पत्र दिले होते. औरंगाबाद पोलिसांनी एकदिवस आधी मोर्चाचे ठिकाण बदलावे म्हणून संघटनेकडे आग्रह धरला परंतु संघटनेनी भूमिका घेतली की आम्ही आता सगळी तयारी केलेली आहे मोर्चा ठरलेल्या ठिकाणावरून निघणार त्यामुळे संघर्ष निर्माण झाला. सकाळी राज्यभरात आंदोलक क्रांती चौकात जमत होते पोलीस त्यांना धमक्या देऊन हाकलून लावत होती. मोर्चेकरी मागे हटायला तयार नव्हते.

दिपक केदार यांची एंट्री आणि पोलीस बाजूला सरकले. अचानक मोर्चाच्या वेळेला दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना हे गाड्यांच्या ताफ्यासहित आले. त्यांनी गाडीवरून इशारा केला की मोर्चा येथूनच जाणार अचानक हजारों आक्रमक आंदोलक बघून पोलीस यंत्रणा बाजूला झाली आणि मोर्चा क्रांती चौकातून गतीने निघाला. पुढे साखळी करून कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी आंदोलकांनी घेतली. घोषणाबाजी करत मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.

नेत्यांनी डागल्या भाषण तोफा राज्यभर दलितांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात ऑल इंडिया पँथर सेनेच्या राज्यभरातून आलेल्या नेत्यांनी भाषणातून समाचार घेतला. विविध भागातून आलेल्या नेत्यांनी दलित अत्याचार, महागाई, बेरोजगारी, कामगार यांच्या 54 मागण्यांसंदर्भात भूमिका मांडली

दिपक केदार यांच्या भाषणाने वातावरण टाईट झाले. यावेळी दिपक केदार यांचे भाषण सुरू होताच एकच नारा देण्यात आला जोर से बोलो जयभीम बोलताना त्यांनी सांगितले की, आमचे स्वतंत्र कुठंय? एकीकडे हर घे झेंडा अन् दुसरीकडे मटक्याला शिवला म्हणून दलित चिमुरडा मारला जातोय. आमचा आक्रोश समाज व्यवस्था बदलाचा आहे, आमचा आक्रोश समाज रक्षणासाठी आहे, आमच्या मागण्या मूलभूत हक्क अधिक्र्यांच्या आहे. राज्यसरकार मला घाबरत असून मंत्रालयात बसून मुख्यमंत्री माझा मोर्चा रोखण्याचे चिल्लर काम करत आहेत. त्यांना सांगतो माझी दाढी तुमच्यापेक्षा चांगली आहे तुमच्यापेक्षा माझे स्टेटस जास्त गाजतात. तुम्ही झाला असाल गुवाहाटी मार्गे मुख्यमंत्री मी रस्त्यावरील आंदोलक आहे आणि सर्वात मोठी ताकद भीमसैनिक आहे. मी रस्त्यावरचा राजा आहे, सत्तेची मस्ती सहज जिर्वण्याची ताकद माझ्या आंदोलनात आहे. कोणताच मायचा लाल हे भीमसैनिकांचे कडे तोडून आत येऊ शकतं नाही अशा इशारा दिला. मुंबईला लवकरच येतोय कोण अडवतो तेच बघतो.

तसेच सफाई कामगार नाल्यात गुदमरून मरतोय, बेरोजगार फाशी घेतोय, शेतकरी हवालदील झालाय, भूमिहीन मजूर उद्दवस्त झाला आहे, महागाई भयानक वाढली आहे, देशात हुकुमशाही सुरू झालेली आहे, घरकुलला 5 लाख रुपये द्या, सामाजिक स्वतंत्र द्या, ऊसतोड मजुरांना कारखान्यावर घरकुल आणि संडास बाथरुम द्या, आर्थिक, कर्ज प्रकरणे माफ करा, असे अनेक 50 मागण्यांना घेऊन त्यांनी भूमिका मांडली. अपंगांच्या सुद्धा मागण्या त्यांनी वाचून दाखवल्या. आज लढावं लागेल तरच आपलं अस्तित्व टिकेल अन्यथा आपण गुलाम होऊ त्यामुळे गुलामी नाकारायची असेल तर संघर्ष करावा लागेल. ऑल इंडिया पँथर सेना दंगलीतून उभा राहिलेली संघटना नाही, आम्ही माणसं मारून नेते होणार नाहीत, दंगल करून माझा स्वार्थ साधणार नाही ही आमची संवैधनिक लढाई आहे.

नव्या संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केली. नव्या संसदेवरील स्तंभ हा हिंस्त्र आहे, त्याला बदलवून टाकावे. हुकुमशाही चे प्रतीक उभा करणे हा यांचा अजेंडा आहे.

आंदोलनात महराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, महासचिव सचिन तिवारी, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, राज्य सरचिटणीस जितेश जगताप, राज्य प्रवक्ते बंटी दादा सदाशिवे, जिल्हा अध्यक्ष अमोल शेजवळ, जिल्हा अध्यक्षा ज्योतिताई जुमडे, मुंबई महिला नेत्या मीनाक्षी ताई बोर्डे, कोकण महिला अध्यक्षा अमृता वाघमारे, महिला नेत्या सुषमा शिंदे, संगमनेर प्रमुख करुणा मोकळ, रायगड, उस्मानाबाद, मुंबई, पुणे, धुळे, नंदुरबार, गुजरात, कर्नाटक, बीड, हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, खामगाव, नांदुरा, मेहकर, मलकापूर, लोणार, रिसोड, नागपूर, चंद्रपूर, मंठा, जालना, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर, नांदेड, पालघर, औरंगाबाद ग्रामीण शहर राज्यभरातील सर्व जिल्हे तालुक्यातून गावा गावात हजारो पदाधिकारी या मोर्च्यात सहभागी झाले होते.

औरंगाबाद संयोजक टीम म्हणून शुभम मगरे, कुणाल मगरे, रोहित जगधने, कमलेश दाभाडे, उमेश निकम, अमर लोखंडे, गजानन साळवे, गणेश बगळे, मिलिंद नरवडे, रोहित कांबळे, जितु रणशुर, तुषार गायकवाड, साहिल कांबळे, स्वप्नील कांबळे इत्यादी शेकडो कार्यकर्ते यांनी अतिशय संघर्षातून हा मोर्चा यशस्वी केला.

मोर्चाच्या व्हिडिओ ने महाराष्ट्र हादरला आहे. राज्यभर पँथर चीच चर्चा आहे. निळा जनउठाव अभूतपूर्व संपन्न झाला.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!