आमची “दलित पँथर” म्हणजेच ऑल इंडिया पँथर सेना – बंटी दादा सदाशिवे

पुन्हा “दलित पँथर” पाहिजे अशी खंत कशाला?
दलित पँथरची पूनावृत्ती दिपकभाऊ केदार यांनी “ऑल इंडिया पँथर सेनाच्या” माध्यमातून केली आहे..
पुन्हा एकदा 1972 चा पँथर सफर सुरु झाला आहे. ऑल इंडिया पँथर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष- दीपक भाऊ केदार व ऑल इंडिया पँथर सेनाला जुडलेला प्रत्येक तरुण कार्यकर्त्या बेभान पणे लढत आहे , बिनधास्त व्यवस्थेशी भिड़त आहे.
दलित अत्याचाराच्या पीडितांना दिलासा देत आंबेडकरी जनतेचे विश्वास जिंकत आहे. जशाच तसे उत्तर देत अंगावर केसेस झेलत आहे.
पुन्हा “दलित पँथर” पाहिजे या नावाखाली आंबेडकरी समुदाय विस्कटीत करून फोडन्याचे षडयंत्र आंबेडकरी तरुण ओळखून आहे.
“दलित पँथर” संघटनेला त्या ही काळी कंमकुवत करण्याचे डावपेच खेळल्या गेले , जनावर म्हणून छळले गेले , त्या काळी आपल्यातले काही मनुवाद्यांना विकल्या गेले. विकल्यागेलेल्यांकडून अफवी बदनामी पसरवल्या गेली , मनुवाद्यांच्या डावनीला बांधलेले नेतृत्व पुढे करुन अनेक संघटना निर्माण करत “दलित पँथर” सोबत स्पर्धा लावण्यात आल्या ..
त्यामुळे दलित पँथर पुन्हा पाहिजे म्हणून ऑल इंडिया पँथर सेनाला कमकुवत करण्याचे डाव आम्ही “दलित पँथर’ मधून घेतलेल्या अनुभवाने उधळुन लाऊ. दलित पँथरची पोकळी भरन्यास ऑल इंडिया पँथर सेना सज्ज आहे.
लढनार,भिडनार आणि क्रांति घडविनार.
मोठ्या मनानाने अधुनिक काळतल्या आधुनिक पँथर ला स्वीकार करा,सहकार्य करा. नाहीतर संकुचित विचारधारा बाळगुन गुलामीचे जीवन जगा!!
आमची “दलित पँथर” म्हणजेचं “ऑल इंडिया पँथर सेना”
ऑल इंडिया पँथर सेना
महाराष्ट्र राज्य प्रवक्ता तथा मराठवाड़ा अध्यक्ष
- बंटीदादा सदाशिवे. ✍️