बौध्द मुलीचं दवाखान्यात हत्याकांड…

कोल्हापूर : जिल्ह्यातील साजणी गावांमध्ये दलित कुटूंबातील वर्षा भुपाल कांबळे हिची साजणी गावातील साई क्लिनिक चे डाॅक्टर शरद पाटील नामक आरोपींकडून वर्षाची हत्या करण्यात आली. चार दिवसांपूर्वी घडलेलं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. ऑल इंडिया पँथर सेनेच्या आंबेडकरी पक्ष संघटनाच्या सतर्कतेमुळे प्रकरण बाहेर आले.नराधम आरोपीवर केवळ 306 च कलम लाऊन केस रफदफा करण्याचा प्रयत्न झाला आहे.
जातीयवादी यंत्रणेनी आरोपीला पाठीशी घालण्याचे काम केले आहे. वर्षा या हॉस्पिटल मध्ये काम करत होती. कुणी नसताना डॉक्टरने तत्काळ काम आहे म्हणून तिला दवाखान्यात बोलवून घेतलं आणि सीसीटिव्ही मध्ये फक्त फाशी घेतलेलं फुटेज दिसत आहेत. फाशी घेतल्यावर डॉक्टरने पोलिसाला माहिती का दिली नाही. फाशी घेण्या आधी हॉस्पिटलमधे काय घडलं याचे फुटेज डिलीट कसे काय झाले? प्रेत डॉक्टरने खाली का उतरवले? अनेक वर्ष गरिबीचा फायदा घेत दवाखान्यात कामाला असलेल्या बौध्द वर्षाचे शारीरिक शोषण केल्याचे आरोप सुद्धा कुटुंब करत आहे. काही दिवसांपासुन तीच्या पोटात दुखत होत, त्याच मुळे डॉक्टरने तिला दवाखान्यात बोलवले होते ती गर्भवती तर नव्हती ना? असे अनेक प्रश्न कुटुंबाने उपस्थित केले आहे.
आज जेव्हा आरोपी डॉक्टरला कोर्टात हजर केले तेंव्हा एवढं गंभीर प्रकरण असताना अनुसूचित जातीची मुलगी असताना तपास अधिकारीने कोर्टात पिसिआर मागितलेला नाही याचा अर्थ आर्थिक देवाणघेवाण करून पैशाच्या बळावर प्रकरण दडपण्याचा खेळ सुरू आहे.
ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे. आरोपींवर अट्रोसिटी ॲक्टचे कलम वाढवावे. डॉक्टरने अनेक वर्ष तिच्यावर अत्याचार केल्याचे समजत आहे याची सखोल चौकशी करून 376 चे कलम वाढवावे. संबंधित पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी. पिडित कुटुंबाला 10 लाखांची मदत व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी. पिडित कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे.
स्थानिक जातीच्या आरोपीला वाचण्यासाठी राजकीय दबाव आणनाऱ्या लोकप्रतिनिधीला पँथर दणका देण्यात येईल. आमच्या आया बहिनाना नागवून त्यांना संपवत असाल, जात, पैसा, राजकीय बळावर जर दलितांना कुचलत असाल तर तुमचा माज उतरवल्याशिवय आम्ही राहणार नाहीत. हा पँथर इशारा आहे.
तात्काळ पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट द्यावी, कुटुंबाची भेट घ्यावी. पिडित अनुसूचित जातीची आणि आरोपी सवर्ण असताना अट्रोसिटी ॲक्ट का लावला नाही? यासंदर्भात डीवायएसपी ची चौकशी करून कार्यवाही करावी.
तात्काळ जर भूमिका घेतली नाही वर्षा कांबळे च्या मारेकर्यांवर कठोर कार्यवाही केली नाही तर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येईल.
आज कोल्हापूर जिल्ह्यातील साजणी गावातील पिडीत वर्षा कांबळे यांच्या कुटुंबास आॅल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे, तथागत ग्रुप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुहास हुपरीकर,व सामाजिक कार्यकर्ते निखिल कुरणे व आकाश कांबळे यांनी भेट दिली.