मातंग समाजाच्या शेतकऱ्याची निर्घृण हत्या…

औंरगाबाद : पिसादेवी, येते मातंग समाजाच्या जनार्धन कसारे यांचे निर्घृण हत्याकांड झाले आहे. गावगुंड जातीयवादी आहे, त्याच्यावर 2008 ला जनार्दन कासारे यांनी अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गायरान जीमिनीचा वाद होता. 2008 ते आजपर्यंत हा वाद असल्याचे पोलिसांना सुद्धा माहित होते. तरीसुद्धा या मातंग समाजाच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण दिलेले नाही. जर पोलीस संरक्षण दिले असते तर जनार्दन वाचले असते.
आज शेतात जनार्दन कसारे यांच्या डोक्यात गंभीर शस्त्राने वार करून हत्याकांड केले आहे. ज्यामुळे ते जागीच मरण पावले आहेत. मृतदेह रुग्णालयात आणेपर्यंत पोलीस पोहोचलेली नाही हे निंदनीय आहे.
औरंगाबाद रुग्णालयात हे प्रेत असून जोपर्यंत आरोपीवर 302 अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही होणार नाही, आरोपीला तात्काळ अटक होणार नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भुमिका परिवाराने आणि कार्यकर्त्यानी घेतलेली आहे.
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत आहे.
संबंधित निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन सुद्धा झाले पाहिजे. पिडित कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण मिळाले पाहिजे. मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. आम्ही गुलामी करत राहावे, आम्ही सालगडी म्हणून तुमच्या शेतात राबावे, आम्ही स्वाभिमानाने जगायला लागलो की तुम्ही आम्हाला तोडून काढता. पुन्हा तोच प्रश्न आमचं स्वतंत्र कुठंय? आमचा हक्क कुठंय? आम्ही माणसं नाहीत का?
तात्काळ राज्य सरकारने, औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन यंत्रणा हलवावी अन्यथा मातंग समाजाच्या अस्तित्वासाठी लढा राज्यव्यापी केला जाईल.असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष भाई दिपक केदार यांनी दिला.