चळवळ

दलित अत्याचार थांबवा अन्यथा पँथरच्या धर्तीवर मतदानावर बहिष्कार टाकू – दिपक केदार यांचा गर्भित इशारा लळिंग किल्ल्यावरुन डरकाळी

धुळे : लळिंग किल्ल्यावरुन ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी लाखो जन समुदायाला संबोधित केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, दलित अत्याचाराला दुर्लक्षित केले जात आहे. आज आम्हाला प्रेम केलं म्हणून विष पाजून मारलं जातं असेल, आज महारीन म्हणत पाटीलकीचा आव आणला जात असेल तर हे भयानक आहे. संविधानाने आदिवासी राष्ट्रपती झाली तरी पाटीलकीचा जातीचा तोरा जात नाही. आमचे रक्त सांडत आहे आणि सगळे आंधळे झाले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळाची चिंता आहे, शेतकरी आत्महत्यांची चिंता आहे त्याची बातमी आहे. पण जातीमुळे आमचे मुडदे पडतात ते यांना मुद्देच वाटत नाहीत.
समाज आपल्या पाठीशी असल्याचा गैरसमज करू नका. मी कुणालाच सोडणार नाही, बौद्धांना गृहीत धरू नका. आता मी सुद्धा मैदानात उतरणार आहे. जे होईल ते होईल पण समाजाच्या अस्तित्वाचा लढा लढणार आहे.
कोरोनाच्या नावाखाली आमच्या अस्मितेचे केंद्र बंद केले. जेव्हा भिमाकोरेगाव, जयंती, दीक्षाभूमी, चैत्यभूमी याच ठिकाणी कोरोना म्हणजे यांच्या डोक्यातला मूळव्याध जागा होत होता. मी त्याकाळात लढलो आणि हे कोरोनाचे भूत पळून लावले. मी जेलमध्ये राहिलो पण त्या दिवसापासून पुन्हा लॉकडाऊन लावण्याची हिंमत झाली नाही. ही ताकद आंदोलनाची आहे.
दलित अत्याचार याविरोधात मी लढणार आहे. लढत लढत मरणार आहे. पण मत विकू नका, मत जर विकल नाही तर आपल्यावर हल्ले होणार नाहीत. ज्या महामानवाने आपले चार लेकर गमावून आपल्याला मताचा मूलभूत हक्क दिला त्या महामानवाची विटंबना करू नका. खूणगाठ बांधा मी काहीही करेल पण स्वाभिमानी लढा देऊन चवदार तळ्याचे पाणी आम्हाला ज्या महामानवाने पाजले तेच आमच्यासाठी अमूल्य आहे. त्यामुळे आम्ही भिकारी नाहीत याची सवय लावा.
आज शिवसेना अचानक आंबेडकरवादी पुरोगामी झाली आहे. सगळे मिळून तिला वाचवायला निघाले आहेत. पण आम्ही इतिहास विसरलो नाहीत, बाळ ठाकरे कायम महामानवाच्या नावाला विरोध करत होते. विद्यापीठाला नाव देण्यासाठी त्यानेच विरोध केला. भिडे ला भेटायला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री जातात हे कसे काय? पँथर भागवत जाधव च्या डोक्यात पाट्ठा घातलात, आमच्या रक्तातून शिवसेना जन्माला आली. आम्हाला येते जातीचा वास येतो. हे बदलू शकत नाहीत याची आम्हाला जाणीव आहे. बदलले असतील तर त्याच्या नावात आता ते हिरवा निळा रंग टाकणार आहेत का? आज तरी माझ्या बापाचं चुकल म्हणून मुलगा पत्र काढेल का?
सतर्क व्हा, आपला कुणी वाली नाही. पेटून उठा खाजगीकरण आपल आरक्षण संपवणार आहे. गुलामी आपल्या दारात उभी आहे, आज जर लढलो नाहीत तर गळ्यात मडक पाठीला झाडू येईल.
संविधान वाचवण्यासाठी एकत्र संघर्ष करू. संविधान वाचवणे आणि मनुवाद गाडणे हा आमचा अजेंडा आहे.
समाज कुणाच्या पाठीशी नाही कुणीही समाजाच्या मताची बोली लावू नका. जेंव्हा दलितांचे रक्त सांडते तेंव्हा तुम्ही कुठे असतात. सर्व पक्ष आता आमच्या मुळावर उठली त्यामुळे आम्हाला दुर्लक्षित करणे थांबवा अन्यथा मतावर बहिष्कार चा एल्गार पुकारेल्याशिवाय मी राहणार नाही.
माझा हा गर्भित इशारा समजावा मी कुणाच्या बापाला घाबरत नाही कारण बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान दिला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी भूमिका मांडली.
लाखो लोकांनी यावेळी जोरात जयघोष घोषणाबाजी करून दिपक केदार यांच्या मताला जोरदार पाठींबा दिला. मुंबई ला बहिष्कार किती महाग गेला होता तो ईतिहास जिवंत आहे.
त्यामुळे इतिहासाची पूनारावृती करू नका. तरुणांनी मोठ्या प्रमाणत यावेळी फोटो काढले. सगळ्यांना भेटण्याचे काम दिपक केदार यांनी केले.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!