चळवळ

मोहन भागवत राजस्थान हायकोर्टासमोरील मनुचा पुतळा पाडण्यासाठी सोबत चला तेच खरं पापक्षालन होय – दिपक केदार

खामगाव : ऑल इंडिया पँथर सेनेचा भव्य धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त खामगाव येते धम्म सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला लाखो जनसमुदाय उपस्थित होता. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी जोरदार फटकेबाजी केली.

देशभर बौध्द अंगिकारला जातोय तेव्हा पोटातून जाणारा धर्माचा रस्ता बंद होतोय की काय याची भीती काही मंडळींना वाटायला लागली. मोहन भागवत सुद्धा आता पापक्षलानाची भाषा करू लागलेत त्यांनी महिलांना गुलाम ठेवलं, दलितांना नाकारलं हे मान्य केलं आहे आणि त्यासाठी त्यांनी पापक्षालन करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांना माझा सल्ला आहे, मनुस्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केली, तुम्ही राजस्थान हायकोर्ट समोर उभा असलेला मनूचा पुतळा पडायला आमच्या सोबत चला, पुढे व्हा आणि हा पुतळा पाडा आम्ही तुमच्या सोबत आहोत उगाच नुसता आव आणू नका तेच खरं पापक्षालन असेल असा टोला त्यांना लगावला आहे.

बावीस प्रतिज्ञा आमचा संवैधानिक अधिकार आहे, त्याला रोखण्याचे षडयंत्र सुरू आहे. आम्ही सुद्धा हे रोखू देणार नाहीत, आता मोठ्या प्रमाणात भारत बौध्द मय होतोय, धर्मांत्तर सुरू आहे अशावेळी राजेंद्र पाल गौतम यांचे शिर कलम करण्याचा फतवा आयोध्यातील गुंड बाबाने काढला गृहमंत्र्यांनी कंगना सुरक्षा दिली पण आम्हाला सुरक्षा दिली जात नाही. राजेंद्र पाल गौतम यांना धमक्या देणाऱ्यांना अटक करा अन्यथा आयोध्याला येइला आम्हाला भाग पाडू नका. बौध्द धम्मात येणाऱ्या बांधवांना सुरक्षा देण्याचे काम पँथर फौज करेल.

महाबोधी बुद्ध विहार मनूवाध्यांच्या तावडीतून मुक्त करणार त्यासाठी देशव्यापी लढा देणार. लेण्यांवरील अतिक्रमण हटवून लेण्या भंतेंच्या ताब्यात देण्याचे आंदोलन सुद्धा तीव्र करणार आहोत. पँथर मुळे जातीय अत्याचार कमी झाले आहेत. जातीयवादी जिल्ह्यातील काही बांडगुळ माजले होते त्यांचा माज उतरवला आहे. अट्रोसिटी ला रॉबरी लावण्याची धमकी देणाऱ्यांना आता विधानसभा लोकसभा दिसू देणार नाही.

गेली पाच वर्ष मी एकटा पळत होतो, सगळे एसी मधे होते पण आज निळा झेंडा विकायला सगळे अचानक आलेत त्यांना विचारा आमचे मुडदे पडत होते तेंव्हा ते कुठे होते आता समाजाला विकू देणार नाही.

आम्ही सगळे एक आहोत जेव्हा जेव्हा आमच्या अस्तित्वावाचा आणि अस्मितेचा मुद्दा पुढे आलेला आहे तेव्हा तेव्हा आपण एक झालेलो आहोत. आंबेडकर भवन बचाव आंदोलन आपण पक्ष संघटना बाजूला ठेऊन केलं, रिडल्स असेल नामांतर असेल हे सगळे लढे पक्ष संघटनांना मूठमाती देऊन लढलो म्हणून आपलं अस्तित्व आहे. पुन्हा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि संविधान वाचवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. संविधान वाचवावे लागेल तरच गुलामी नाकारू शकतो अन्यथा गुलामी पुढे आहे.

बुलढाण्यात सर्व तालुक्यात संघटना मजबूत झाली आहे.ही गर्दी भल्याभल्यांना घाम फोडणारी आहे. एक काळ होता मी एकटा घटनास्थळी पळायचो आता पीडितांना भेटायला पाच ते दहा हजार पँथर घेऊन गावात घुस्त असतो त्यामुळे पँथर दारारा निर्माण झाला आहे. पँथर युग बदल घडवणार देशात पहिला पँथर पॅटर्न बुलडाणा पॅटर्न म्हणून पुढे येणार हे मी जाहीर करतो.

ऑल इंडिया पँथर सेना समाजाच्या आया बहीनिंसाठी लढत आहे. आपण सर्व साथ द्या, मत विकू नका क्रांती घडणार म्हणेज घडणार. राहुलजी अंविकर झुंजार प्रबोधन कार आहेत आता त्यांचा हात माझ्या डोक्यावर आहे. त्यामुळे आणखीनच बळ आले आहे.

आम्हाला आनंदाचा शिधा अन् गुजरातला टाटा कंपनीचा मलिदा आम्ही शिधा घेत बसलो तोवर तिकडे कंपनी गेली. मी मुख्यमंत्री असतो शेतकऱ्यांना एका फटक्यात 50 हजार एकरी मदत केली असती. ते काम या सरकारने केलं पाहिजे ते करत नाही हे निदनिय आहे.

आयोजक प्रकाश धुंदले, अतुल इंगळे सर्व ऑल इंडिया पँथर सेना खामगाव तालुका बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठा संघर्ष केला, स्वाभिमानाने हा कार्यक्रम निर्माण केला. साधने नव्हती तर मोटार सायकलल भोंगा लाऊन प्रचार केला. आता पर्यंत कुणाचीच एवढी मोठी सभा झाली नाही. मैदानात सर्वात जास्त तरुण आणि महिला होत्या.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!