शैक्षणिक
सामाजिक न्याय विभाग जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांची थट्टा करताना दिसत आहे- ऑल इंडिया पँथर सेना

नांदेड:गेले दोन महिने झाले पात्र विद्यार्थ्यांची यादी लागूनही रक्कम अजूनही जमा झाली नाही.पूर्णतः बोगस पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून अनेक विद्यार्थ्यांना 50% ची अट, शैक्षणिक खंड, की/ मी अश्या अनेक जाचक अटी लावून अनेक विद्यार्थ्यांना कायम अपात्र यादीत टाकले आहे.
विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्न व अटी संदर्भात आज नांदेड समाज कल्याण कार्यालय येथे ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश सावते, जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव सरोदे, गणेश कांबळे, नंदपाल सावंत, व इतर पँथर कार्यकर्ते उपस्थित होते.