परराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत राहणार, पँथर स्टूडेंट फेडरेशनच्या मागणीला यश.

देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबाबतचे धोरण निश्चित करण्याची बाब विचारधीन असल्याचे व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना व सामाजिक न्याय विभागाचे प्रचलित धोरणाबाबतचे कारण देत, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने परराज्यात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातील महाविकास आघाडी सरकारने दि. 25 मार्च 2022 रोजी घेतलेला निर्णय दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी रद्द केला होता. ज्यानंतर ऑल इंडिया पँथर सेना प्रणित पँथर स्टूडेंट फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिकेत साबणे यांनी सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ निषेध पत्रक काढत तात्काळ बहुजन विद्यार्थ्याची आर्थिक गळचेपी करणारे निर्णय घेणे बंद करावेत. परराज्यात शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या हिताची शिष्यवृत्ती रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रभर फेडरेशनमार्फत “शैक्षणिक हक्क बचाव” आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला होता.ह्यानंतर काल महाराष्ट्र सरकारच्या इतर बहुजन कल्याण विभागाने परिपत्रक काढत ओबीसी विद्यार्थ्याना ही शिष्यवृत्ती मिळत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.