शिवसेना बदलली असेल चांगलच आहे, त्यांच्या शिवसेना नावात निळा आणि हिरवा दिसेल का?
आज तरी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला विरोध केला, लोक यात मेली, पँथर भागवत जाधव शहीद झाला त्याचे आज तरी उद्धव ठाकरे भुमिका चुकली म्हणून पत्रक काढतील का?
संकटात आंबेडकरी प्रबोधनकार, आंबेडकरी गायक यांचा वापर करण्याची फॅशन सुरू आहे. जे वनकर शिंदेंच झालं ते पुन्हा अंधारे यांचं होऊ नये. आंबेडकरी प्रबोधनकार गायक यांचा थट्टा थांबवा.
आजही आम्हाला दगड मारणाऱ्या भिडेला उद्धव ठाकरे गुरू मानतात त्यांनी मुख्यमंत्री असताना त्याची भेट घेतली. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याचे उस्मानाबाद येते उपकेंद्र काढून तूकडे करण्याचे षडयंत्र शिवसेना करत आहे. शिवसेना बदलेली नाही ती तशीच आहे.
येणाऱ्या काळात अनेक युत्या अनैतिक दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेसोबत जाणार म्हटल्यामुळे त्या आधीच काही मंडळी जाऊन बसायला लागली आहे. मुळात आता राजकीय पक्षांना विचारधारा राहिलेली नाही. सत्तेचा वाटा आणि गोंधळलेला विचारधारा ही झालेली आहे.
सुषमा अंधारे पहिल्या नाहीत या आधी नीलम गोऱ्हे सुद्धा तिकडे गेल्या त्या आंबेडकरी होत्या त्या शिवसैनिक झाल्या. शिवसेना त्यांनी बदलवली नाही बघू आता तरी भगव्या रंगा शेजारी निळा आणि हिरवा येईल का?
राजकारणी झालं की अशा भूमिका अपेक्षित असतात.
असे मत सम्यक न्यूज शी बोलताना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी व्यक्त केले.