एका दगडात दोन पक्षी, एक #बौध्द दुसरा #ओबीसी…

अनुसूचित जातीचे आंबेडकरी नेते चंद्रकांत हांडोरे ना पचवणे महविकास आघाडी सरकारला सोपे नाही. सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन असणारे अनुसूचित जाती जमातीचे नेते महाविकास आघाडी सरकारला नको आहेत. विरोधकांनी एससी च्या नेत्याला पाडण्यासाठी अफाट पैसा ओतला. सामाजिक न्याय विभागात क्रांतीकारी काम करणारे चंद्रकांत हांडोरे महाविकास आघाडी सरकारलाच नको होते म्हणूनच त्यांना आजपर्यंत परत संधी मिळालेली नाही.
सगळे जणू काही चंद्रकांत हांडोरेना रोखण्यासाठीच सुरू होते. काँग्रेस च्या आतल्या घराणेशाही गटाने हा बळी घेतलेला आहे. नाना पटोले हे नावापुरते प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांचं काँग्रेसमध्ये या घराणेशाही मंडळी पुढे काहीही चालत नाही.
महाराष्ट्रात एक सुप्त चुप्पी युती सुरू आहे, सकाळी 5 वाजता शपथ घेतलेले ते राज्यसभा निवडणुकी वेळी सुद्धा गप्प होते, आणि कालही गप्प होते.
तिघात “नांदायच” तीघाडी नाटक, नावाला सुरू आहे. गाढव सगळ्यांना प्यारी असतात, हुशारांची सगळ्यांना एलेर्जी असते. “बी” टीम कोण हे लपून राहिलेलं नाही, जगजाहीर झालेलं असताना पत्रकारांना शब्द फुटत नाहीत, त्यांच्या पेनाचा टोक लिहिता लिहिता मोडून जातो.
सरकारला धोक्यात आणणारे सरकारच्याच आत बसलेले आहेत. मी कायम सांगत आलोय की येते तिघांची नाही तर चौघांची सत्ता सुरू आहे.
सगळी लढाई केवळ चंद्रकांत हांडोरेना पाडण्यासाठी होती का? महाराष्ट्रातील काँग्रेसी – राष्ट्रवादी अनुसूचित जातीच्या नेत्यांनी यातून बोध घ्यावा. त्यांचा केवळ वापर होऊ शकतो त्यांना काही देण्याची वेळ आली की सगळे एक होतात.
काँग्रेस – राष्ट्रवादी ने छोट्या छोट्या अनुसूचित जाती जमातींच्या राजकीय प्रादेशिक समूहाचे अस्तित्व उध्वस्त करण्यासाठी भरपूर रणनीती आखली आहे. आठ वर्षांपूर्वी जी चूक सोनिया गांधींनी केली छोट्या छोट्या गटांना नाकारण्याची त्यातून त्यांना केंद्रातून जावं लागलं. राज्य काँग्रेस सुद्धा आजही त्याच भूमिकेत आहे, इतिहासातून काहीच शिकायचं नाही आणि बदलायचच नाही ही निगरगट्ट भूमिका काँग्रेस ला पुन्हा पुन्हा बुडवणार. काँग्रेस च्या आतली घराणेशाही “अनुसूचित जाती जमातींच्या” समूहांना घाबरते त्यांच्यातच यांना नडण्याची ताकद आहे त्याचा उपयोग जर नाना पटोलेना करता येत नसेल तर त्यांचा राजकिय बळी सुद्धा लवकरच जाईल…
काँग्रेसच्या अंतर्गत सरंजामशाही घराणेशाहीने बौध्द चंद्रकांत हंडोरे सहित ओबीसी नाना पटोलेंचा सुद्धा गेम केला आहे!
एका दगडात दोन पक्षी मारलेत! महाराष्ट्रातली काँग्रेस एका जातीपूर्ती कर्मठ ठेवण्याचा हा घराणेशाहीचा डाव आहे!!
-दिपक केदार
ऑल इंडिया पँथर सेना, राष्ट्रीय अध्यक्ष