एआयपीएस संघटना ताकतीने लढली, सर्व वकिलांना जयभीम!

क्रांतीकारी लढा जिंकला…
महापुरुषांची अस्मिता वाचवण्यासाठी समाजकंटक प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी चंद्रकांत पाटीलच्याच तोंडावर शाई फेकून तीन शूरवीर सैनिकांनी क्रांती केली त्याचं आम्ही पहिल्या दिवसापासून समर्थन केले आणि जाहीर केले की ही क्रांती आहे!
मनोज गरबडे, आकाश गजहज, विजय ओव्हाळ या तीन वाघांनी हा लढा लढला त्यांना आज कोर्टातून जामीन मंजूर झाला. आंबेडकरी समाजाच्या वकिलांनी आपली ताकद दाखवली आणि त्यांना जामीन मिळाला. Ad. स्नेहाताई कांबळे, adv. वंदनाताई गायकवाड व इत्यादी वकिलांच्या सातत्याने संपर्कात राहिलो.
सर्व लढाऊ वकिलांचे ऑल इंडिया पँथर सेना अभिनंदन करत आहे, आभार व्यक्त करत आहे.
पहिल्या दिवसापासून ऑल इंडिया पँथर सेना मैदानात आहे. वाचाळ स्टेटमेंट आल्या आल्या औरंगाबाद येते महाराष्ट्र प्रवक्ते बंटी दादा सदाशिवे, औरंगाबाद नेते शुभम मगरे यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना अटक झाली.
पिंपरी चिंचवड मध्ये मोठी रिअक्शन मिळाली आणि एकच चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्यावर पोलीस स्टेशन पासून ते आजच्या कोर्टातील सुनावणी पर्यंत पुणे टीम व पिंपरी चिंचवड टीम सक्रिय काम करत होती. या टीमने कधीही स्वतः चे नाव व संघटनेचे नाव पुढे येऊ दिले नाही हा समाजाचा लढा म्हणून ठामपणे पाठीशी उभा राहिले रस्त्यावरचा संघर्ष करून सरकारला झुकवण्याचे काम केले. एवढंच नाही तर मोर्च्यात आणलेल्या पक्षाचे झेंडे सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांनी गुंडाळायला लावले आणि अतिशय संवेदन शिलतेने ते लढले…
ऑल इंडिया पँथर सेनेनी या घटनेला घेऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्हे एवढंच नाही कर्नाटक येते सुद्धा निवेदन दिले आणि राज्यव्यापी भूमिका घेतली त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी जयभीम करतो!
पुण्यात पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्या दिवसापासून ते आजच्या न्यायालयासमोर ताकद दाखवून रस्त्यावर लढणारे आमचे ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस जितेशभाई जगताप, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, युवा जिल्हा अध्यक्ष आप्पा काशीकर, जिल्हा नेते अनिल गायकवाड, किरण गायकवाड, संतोष शेंडगे, शिवाजी शेंडगे, रामभाऊ ठोके, गौरीताई शेलार, अक्षय कसबे, तुषार गायकवाड, काकडे, इंगळे इत्यादी शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गेली चार दिवस या सर्व प्रकारनात लढा दिला त्यांना क्रांतीकारी जयभीम!