अघोषित “गृहयुद्ध”

आसाम मध्ये मारलेले, मेलेले, रक्तबंबाळ,
आगडोंब, अक्राळविक्राळ आवाज,
सैनिकी अत्याचार, धुरांचे गोळे, गोळ्याचे लाठ्याचार्जचे सरकारी फर्मान आता काही दिसणार नाही,
मीडिया तिकडे फिरकणार नाही,
नेते नजरकैदेत, आंदोलक जेरबंध
कसलीच बातमी आता येणार नाही…
आसाम किती पेटलंय
किती लोक घायाळ झालेत
हे बघण्यासाठी
सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागेल…
तिथे जाण्यास
मोदीचे वारसदार शहा बंदी घालतील
सैनिकांचा धुमाकूळ चालत राहील
पत्तीचे हिरवे पानं लाल होतील
राहुल गांधी निघाल्या सारखे करतील
सर्वपक्षीय विमानवारी होईल
विमानतळावरून वापस पिटाळून लावतील
अमेरिकेचे गोरे गोमटे
मोदी शहाचे चोमटे
हवेतून शिष्टमंडळ येईल
पाहणी करून Always Undercontrol
Always Ok म्हणून या बोटावरचा थुका त्या बोटावर करून दाखवतील…
अर्धमेला केलाय यांनी जम्मू काश्मीर
आता जखमी करतील आसाम
हे अघोषित “गृहयुद्ध” चालत राहिल
धर्मवेडे, धर्मगाढवे, पिसाळलेले धर्मकुत्रे,
निघालेत जिकडे मुंड जाईल तिकडे
त्यांच्या भीतीने सुरू आहे
आगडोंब अन धावपळ उगाच
पिसाळलेल धर्मकुत्रं ठेचून काढण्याचा
अजेंडा असावा
गोल घेराडा घालून हा
कुत्रा एकदाच ठेचावा…
– दिपक केदार