सत्ता म्हणाली न्यायाला

सत्ता म्हणाली
न्यायाला थांब तुझ्या बोकांडी बसते,
न्याय म्हणाला सत्तेला
एवढी माजू नको
फेक एन्काऊंटर नौटंकी करू नको
सत्ता ऐकत नव्हती कुणाचं
अखेर…
न्यायाला बदनाम करून
‘छिनाल सत्ता” पेढे खात होती
तिला जनतेनी डोक्यावर घेतलं होतं
जयघोष केला
भावनांचा पूर आला
फुलांचा वर्षाव झाला
सत्ता म्हणाली न्यायाला
तुझं आता काही काम नाही
धर ठोक नावाचा कायदा आम्ही पारीत करू
पाहिजे त्याला उचलू
पाहिजे त्याच्या गांडीत गोळ्या घालू…
काय करतो न्याय,
येते लोकांना खुश ठेवणं आमचं काम आहे!
न्याय म्हणाला सत्तेला
विसरले काय??
2002 चं कांड
चूक झाली आमची
तेंव्हाच तुम्हाला गाडलं असतं तर
आज न्यायाला बदनाम होण्याची वेळ आली नसती
सत्ता तुला आता माझ्यापुढ
उभा राहावाच लागेल
खरं काय खोटं काय सांगावाच लागेल
तेंव्हा सत्ता हसत बोलली
“खोटं खरं”
“खरं खोटं” यात फरक काय?
शब्द फिरवला की अर्थ बदलतो!
न्याय… तुझ्या सगळ्या नांग्या आम्ही ठेचल्यात
पाहिजे तसं तुला चुरगळलय
संविधान बदलण्यासाठी जाळण्याची गरज काय
तुझ्याच मार्गाने पान जाळता येतात
लोक ही खुश, आमचा मनुही खुश
तू आता चुना लावून बोंबलत बस
निर्जीव सारखं आपलं नावाला बस
तुझी आता येते गरज नाही
लोकांना फिल्मी सिंघम आवडतो रे
आजवर आम्ही फक्त न्यायालय
बदनाम करणारे चित्रपट काढलेत
जजला हिरो करणारा डायरेक्टर येते नाही रे
न्याय हतबल होऊन
बोलला… अराजकता माजेल
तुमचं काम सुद्धा लोकच करू लागतील
आज तुमच्या डोक्यावर फुल उधळीतील
उद्या लोकच लोकांच्या डोक्यावर फुल उधळतील
न्यायाच्या नावाखाली रोज नवा गुन्हा घडवतील
आज रस्त्यावर गोळ्या घालत आहेत
उद्या संसदेत घुसून तुमच्यावर गोळ्या घालतील
तुमचाच शिरच्छेद करतील
तुमच्या रक्षणाला दिलेलाच रक्षक
तुम्हाला गोळ्या घालेल
तेंव्हा न्याय न्याय म्हणत दम तोडावा लागेल
न्यायाची भीती काढणाऱ्यांनो,
तुम्हाला न्यायावाचून मरण्याची वेळ येईल…
सत्तेच्या मस्ती पायी,
कायदा संपलेला असेल तेंव्हा
भीती संपलेली असेल
व्हाल एवढे हातबल की
स्वतःच्या डोक्यात स्वतःलाच गोळी घालून
स्वतःचाच एन्काऊंटर करण्याची वेळ येईल!
– दिपक केदार