राष्ट्रीय
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणून फिरवले जाणारे हे विधान बनावट, काल्पनिक नी खोटे आहे – हरी नरके

बाबासाहेबांनी असे कधीही म्हटलेले वा लिहिलेले नाही. बाबासाहेबांच्या लेखन आणि भाषणे खंड १ते २२ मध्ये हे विधान नाही. अशी विधाने देताना त्याचे संदर्भ, (पुस्तकाचे नाव, पृष्ठ क्रमांक द्यायचे असतात.) ते इथे दिलेले नाही.कारण हे कोटेशन बनावट आहे. बाबासाहेबांच्या नावे अशी फेक विधाने अफवा व कुजबुज गँगच्या आयटी सेलकडून सतत फिरवली जातात.यामागे बुद्धिभेद करण्याचे दुष्ट मानस असते.ही वृत्ती समताविरोधी आहे.
प्रा. हरी नरके, संपादक डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १७ ते २२ यांनी ट्विट च्या माध्यमातुन मनुवादी प्रवृत्तीची पोलखोल केली आहे.