नागालँड राष्ट्रवादी – भाजप युती; महाराष्ट्रात सर्वच पक्ष भाजपसोबत!

नागालँड : राष्ट्रवादी भाजप युती मुळे देशात एकच चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार हेच भाजप सोबत नागालँड ला युती करत असतील तर याचा अर्थ काय? भाजपला रोखायचंय, संविधान वाचवायचंय, हुकूमशाही विरोधात विरोधकांनी एकत्र येईचंय या भाषणातील मुद्यांना आता किती आधार राहिलाय? सोशल मीडियात आज यावर मोठी टीका बघायला मिळाली एवढंच नाही तर शरद पवार यांच्यावर याचमुळे विश्वास ठेवत नाहीत” असा आरोपही करण्यात आला.
महाराष्ट्रात आता गैरभाजप कुणी उरलेले नाही. महाविकास आघाडी थेट भाजपसोबत असल्याचे हे संकेत आहेत. “नो विरोधक” नावाचं राजकारण पुढे येतंय का? सगळ्यांची सत्ता मिळून मिसळून खायची हा नागालँड फॅक्टर देशव्यापी झाल्यास लोकशाही चे अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.
शरद पवारांनी भाजपसोबत युती केल्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार आहे कि नाही? उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत युती असलेले पक्ष हे सहन करतील का? जैसे थे राहिले तर समजून जा येते भाजपला हरवायला कुणी आलेलं नाही तर भाजपसोबत नांदायला सगळे तयार आहेत. महाराष्ट्रातील एकही पक्ष भाजप वंशावळीपासून बाजूला नाही. कुणालाही शरद पवारांवर टीका करण्याचा अधिकार नाही? उद्धव ठाकरे शरद पवार युती म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत जे जे ते सर्व शरद पवारांच्या युतीतच येतात, शरद पवार भाजपसोबत म्हणजेच राजकीय वंशावळ महाराष्ट्रात कशी केली तरी भाजपकडेच जाते.
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला सोडून जो बाजूला असेल तोच भाजपच्या या नात्यापासून वेगळा असू शकतो अन्यथा सगळं ढोंग आहे.
शरद पवार यांच्याशी शत्रुत्वाचं नुसतं ढोंग सुरु आहे, आतून मैत्री आहे. सगळ्यांचे टपाल भाजपकडे पोहोचवण्याचे काम पवारांच्या मार्फत सुरु आहे. नो विरोधक नावाची हि चळवळ घातक आहे.