चळवळ

खिर्डी बौध्द तरुणाचे हत्याकांड, दिपक केदार पीडितांच्या घरी

औरंगाबाद खुलताबाद तालुक्यातील खीर्डी गावात एका बौध्द तरुणाच्या डोक्यात कुराड घालून हत्याकांड करण्यात आले आहे. आज पिडित कुटुंबाला भेट देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात आठ दिवसात अनुसूचित जातीचे हे दुसरे हत्याकांड आहे. दोन्ही घटनात कुराडीने हल्ला झाला आहे. कायद्याचा पोलिसांचा धाक राहिलेला नाही. दलित महाराष्ट्रात असुरक्षित झाला आहे.
शेतकरी असलेलं हे दलित कुटुंब यांच्या आजोबांनी प्रस्तापित जात दांडग्याकडून जमीन विकत घेतली आज त्यांना वाटतय दलितांनी शेती करू नये अनेक वर्षांपासून कधी बांधावरून कधी जनावरांवरून भांडण काढून या पीडित कुटुंबाला धमकवण्याचा प्रयत्न झाला. बैल शेतात सोडला याचा जाब विचारायला गेलेल्या किरण चव्हाण या बौध्द तरुणाच्या डोक्यात कूराड टाकली दोन दिवस अडमिट असलेल्या किरणचा औरंगाबाद रुग्णालयात मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्याला तीन मंत्री लाभले सगळे खुश आहेत, तिन्ही मंत्री असंवेदनशील निघावेत हे दुर्दैव आहे. एकानेही या दलित कुटुंबाची भेट घेतली नाही. विधिमंडळात हा प्रश्न मांडला नाही औरंगाबाद जिल्ह्यात दलित अत्याचाराने थैमान घातले आहे. हा जिल्हा दलित अत्याचार ग्रस्त म्हणून जाहीर झाला पाहिजे. पीडितांना 50 लाखांची मदत, एका सदस्याला शासकिय नोकरी, कायमस्वरूपी संरक्षण, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी आज पोलीस अधीक्षक औरंगाबाद यांच्याकडे करण्यात आली. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यानी केली

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!