अग्रलेख

रायगडमध्ये दलित आदिवासीसाठी पँथर दिपक केदार धावून आले!

ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार गेली अनेक वर्ष संविधान बचाव असेल, समाजातील कोणत्याही घटकातील महिला असतील, लहान मूल असतील, तो कोणत्याही समाजाचा असो, ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो, त्याठिकाणी सगळ्यात पहिले राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार पोहचतात. त्यांचा हा खडतर प्रवास बघून अनेक तरुण कार्यकर्ते त्यांच्या विचाराने प्रेरित झाले. या समाजाला वाचवण्यासाठी आता तरी आम्हाला एकमेव पर्याय दीपक भाई केदार दिसतात.

दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यामध्ये मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून भाईंच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेड्यापाड्यात संघटन वाढवण्याच्या दृष्टीने अहोरात्र मेहनत घेतोय. खरं पाहता रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये आमची भगिनी दीक्षा ताई कसबे हिला न्याय मिळून देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी व रायगड जिल्ह्यातील सर्व तरुणांनी महिलांनी जो प्रयत्न केला, जो संघर्ष केला, त्याला देखील आम्ही सलाम करतो.

आपल्या बौद्ध समाजातील तरुणांना त्यांनी व्यवसाय करू नये, या उद्देशाने काही समाजकंटक त्यांच्या व्यवसायाला अडथळा निर्माण करत होते. त्याठिकाणी देखील दीपक भाई यांनी व्यावसायिक ॲट्रॉसिटी चा मुद्दा पुढे करून त्या समाज बांधवाचा हॉटेल अँड रेस्टॉरंट चालू करून दिला. तो आज अगदी संघर्ष आणि कष्टाने हॉटेल चालवत आहे. गेले अनेक वर्ष घोटावडे पुलाचा मार्ग हा खराब झाला होता, तेथील ब्रिज मोडकळी आला होता, त्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून उपोषणाला बसलो. राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी त्या ठिकाणी देखील येऊन 15 लाखाचा निधी मंजूर करून दिला.

पनवेल या ठिकाणी आदिवासी महिले वरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी देखील त्या नराधमा वरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात पनवेल ची टीम व ऑल इंडिया पॅंथर सेना पुढे आली. पेन येथील आदिवासी समाजातील आमच्या नाबालिक मुलीवरती अतिप्रसंग झाला होता आणि त्या ठिकाणी सगळ्यात पहिले आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार त्या ठिकाणी भेट द्यायला गेले. एक दोन वर्षात जाणारा दमाने कृत्य केलं होतं त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली, अशा प्रकारच्या अनेक रायगड जिल्ह्यातील घटना असतील.

त्या महाराष्ट्रामध्ये दीडशे ते अडीचशे घटनांना समक्ष जाऊन भेटी देऊन न्याय मिळवून देणारे आमचे दीपक भाई केदार त्यांच्या संघर्षमय कहानीला जयभीम!

  • नरेशभाई गायकवाड, जिल्हाध्यक्ष रायगड

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!