Uncategorized

नारळ विक्रेता बौध्द फेरीवाला कुटुंब आत्महत्येच्या उंबरठयावर! केदार गेले धाऊन

पुणे : महानगरपालिका हद्दीत फर्ग्युसन कॉलेज समोर दोन बाय दोन फूटपाथ जागेवर किसन गायकवाड गेली 36 वर्ष नारळ विकत आहेत. त्यांच्या संघर्षाकडे आजूबाजूचे लोक कौतुकाने पाहतात त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. तीन मुले आणि एक मुलगा पत्नी असं त्यांचं कुटुंब आहे. त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. दहा वर्षांपूर्वी किसन गायकवाड यांचं ऑपरेशन झालं त्यात त्यांना फुफुसाचे मोठे ऑपरेशन करावे लागले. यात त्यांना दहा लाख रुपये खर्च आला, त्यांच्या स्वभावामुळे आजूबाजूच्या मित्र सहकाऱ्यांनी त्यांना पैसे गोळा करून ऑपरेशन केले. या ऑपरेशन मुळे त्यांचा एक हात उचलत नाही, शरीर विक झाले आहे.

त्यामुळे नाईलाजाने पत्नीला त्यांनी नारळ फोडायला शिकवले. मुलीचे लग्न करायचं आहे, एका मुलीच्या लग्नाचे कर्ज आहे आणि जे काही आहे ते नारळ फोडून विकणे हाच त्यांचा उदरनिर्वाह आहे.

अचानक काळाने झडप घातली आणि स्मार्ट सिटी नावाचा बागुलबुवा जन्माला आला. पुणे स्मार्ट सिटी झाली आणि पहिला हातोडा त्यांनी गरीबांच्या ठेल्यावर मारायला सुरवात केली. फेरीवाले हटवण्याचे काम अतिक्रमण विभाग घेत आहे. रोज किसन गायकवाड यांना तगादा वाढला, रोज रोज पोलीस, अतिक्रमणाच्या गाड्या यामुळे ते तणावात गेले की आता पोटाच काय? भाकरीच काय? मुलीच्या लग्नाच काय? जगायचं कसं? या चिंतेने एकेदिवशी किसन गायकवाड यांच्या पत्नीला डोक्यात सौम्य असा धक्का बसला नस damage झाली. आता त्यांना दवाखान्यात सातत्याने न्यावे लागते.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या ऑफिसला जाऊन त्यांनी व्यथा मांडली. घायमोकलून गायकवाड रडु लागले, आणि मला मेल्याशिवाय पर्याय नाही म्हणत व्यथा मांडू लागले. तात्काळ दिपक केदार यांनी घटनास्थळ गाठले. छोटा विषय अशा कसलाही विचार त्यांनी केला नाही, आपला माणूस वाचला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. आढावा घेऊन तात्काळ लाईव्ह करून, संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना जोरदारपणे खडसावून त्यांच्याकडून वधून घेतले की आम्ही इकडे येणार नाहीत, तुमचा नारळ व्यवसाय उद्धवस्त करणार नाही तेंव्हा कुठे गायकवाड कुटुंबीयांचे जीव जीवात आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर खुशी दिसली.

यावेळी दिपक केदार यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. स्मार्ट सिटी, जी 20 हे गरिबांचे मुडदे पाडून निर्माण करत असाल, तुम्हाला गरिबांची लाज वाटत असेल तर गरीबांना 15 लाख देणार होते ते आधी द्या. गरीबांचे बळी घेणे थांबवा अन्यथा निवडणूका आहेत परिणाम वाईट होतील. मतपेटीतून गोरगरीब उत्तर देतील. मुख्यमंत्री यांनी दखल घ्यावी कुणी उद्धवस्त होणार नाही याची काळजी घ्यावी. दलित गोरगरीबांच्या मुळावर जर ही तुमची स्मार्ट सिटी उठत असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाहीत.

किसन गायकवाड कुटुंबियांना काही झाल्यास सर्वस्वी पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकार जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. असे खडेबोल केदार यांनी सुनावले. एक एक वाक्य गायकवाड मावशी ऐकत होती आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं, त्यांची व्यथा भयंकर आहे, गरीबांच्या जीवाशी खेळ थांबवा!

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!