चळवळ

जितेंद्र आव्हाड यांना मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या बाबाला दिपक केदार यांनी खडसावले

पुणे : राम मंदिर सध्या भारताचा मीडियातील सर्वात मोठा मुद्दा झालेला आहे. त्या मुद्द्यापुढे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांचे प्रश्न एकदम संपून गेले आहेत. त्यामुळे राम आणि मंदिर यावर कुणी काहीही बोललं की भावना दुखायला लागल्या आहेत. वैचारिक वाद ही भारतीय लढ्याची मोठी परंपरा आहे. महात्मा फुले, बाबासाहेब त्या काळात एकाकी लढत होते, तिकडे पेरियार रामास्वामी या सर्व धर्माची, देवी देवतांची त्यांच्या अस्तित्वाची चर्चा घडवून आणत होते तेंव्हा विचाराने विचाराशी लढाई झाली.

आज अचानक भावना नावाला खुप महत्व आले आहे. भावना दुखावल्या अटक करा, भावना दुखावल्या जेलमध्ये टाका, भावना दुखावल्या ठार मारून टाकतो असे विधान सुरू झाली अन् चिकित्सक अचानक गप्प बसायला लागले.राजकीय पक्ष हा चिकित्सा करू शकत नाही. तो फक्त सामाजिक असण्याच नाटक करू शकतो. मतासाठी मंदिरात जाऊन लोकशाही जिवंत ठेवण्याची भाषा केली जाते तेंव्हा मंदिर आणि लोकशाही याचा खरच काही संबंध आहे का? अशा प्रश्न पडतो.

जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान केलं, त्या विरोधात अचानक जणू देशावर मोठं संकट आलं असे सत्ताधारी मैदानात उतरले. त्यात काळ फासू, जेलमध्ये टाका अशा मागण्या आम्ही समजू शकतो. दोन महिन्यावर निवडणूका असल्यामुळे अचानक जिवंत झालेल्या भावना, एवढ्या तीव्र झाल्यात की अंगावर अनेक रंगांचे चट्टे मारलेले प्रमहांस नामक कुणी तरी उत्तर प्रदेशमध्ये बसून जितेंद्र आव्हाड यांना थेट जिवे मारण्याची धमकी दिली. ही धमकी मीडियात सुरू आहे, त्यामुळे देशभर हे प्रकरण वाढत चालले आहे.

अशावेळी एक वाघ मैदानात उतरला दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना यांनी अचानक उडी घेत, बहुजन असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने भूमिका घेतली.

दिपक केदार यांनी सरळ सांगितले की अशा बाबाला अटक करा, हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालतं, पोलीस, न्याय व्यवस्था येते असताना असं ठार कसे काय मारणार? भावना आणि धर्माच्या नावावर मी वध करेल ही विधान किती धक्कादायक आहे. या बाबाने जरा यादी द्यावी किती लोकाची आता पर्यंत गर्दन, चीभ आणि वध केलेत. आव्हाड असतील दुसऱ्या पक्षाचे पण आज राज्याच्या अस्मितेचा मुद्दा आहे. यूपित बसून कुणी बहुजन नेत्याला मारून टाकण्याची धमकी देणार असेल तर आम्ही शांत कसे बसणार? हा प्रश्न विचारत त्यांनी बाबाच्या बत्त्या गुल केल्या आहेत. एवढंच नाही तर हिंमत असेल तर राज्यात येऊन बोला अशा सज्जड दम दिला.

केदार यांच्या निर्भिड बाण्यामुळे आता कर्मठ बिळात लपले आहेत. पँथर पुढे येण्याच्या आजवर कुणाचीही हिम्मत झालेली नाही.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!