चळवळ

एकही बौध्द मंत्री नाही, बौद्धांना नाकारणे महागात पडेल – दिपक केदार

पुणे : 40 दिवसानंतर मंत्रिमंडळ गठित झालं, आज 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात एकही बौध्द नसल्याचे मत दिपक केदार यांनी व्यक्त केले. त्यांनी या सरकारवर घणाघाती आरोप केलेत. हे सरकार बौध्द विरोधी असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे 600 करोड रुपये परत घेतले ज्यामुळे ऐन पावसाळ्यात रमाई घरकुल सहीत शेकडो प्रश्न निधी अभावी प्रलंबित आहेत. भिमाकोरेगाव आंदोलनातील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. आणि या मंत्रिमंडळात बौध्द मंत्री सुद्धा नाही. त्यामुळे कुठं तरी हे सरकार बौध्द विरोधी धोरण प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांना विसर पडला की त्यांच्या गुवाहाटी टूर मध्ये एक बौध्द महिला तर एक बौध्द पुरुष आमदार होते. बौद्धांना नाकारणे ही भाजपची सवय आहे त्यांच्या पावलावर पाऊल एकनाथ शिंदे टाकत असतील तर बौद्धांना नाकारणे त्यांना महागात पडेल. येणाऱ्या काळात जर तात्काळ भिमाकोरेगाव आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, सामाजिक न्याय विभागाच 600 करोड रुपये परत द्यावेत अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी दिला आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!