राष्ट्रध्वज छपाई विक्रीच सुद्धा खाजगीकरण झालं! शीतल सातपुते यांचा प्रश्न भारतीयांना हादरून टाकणारा!

मुंबई : आंबेडकरी विचारवंत असलेल्या शीतल सातपुते यांनी हर घर तिरंगा मोहिमेमध्ये छपाई आणि विक्री होत असलेल्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये चक्रावून टाकणारे प्रश्न उपस्थित केले आहेत ज्याकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही.
शीतल सातपुते लिहितात,
“ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास आणि ग्रामोद्योग “आयोगाकडे” असतो.
पण हे कंत्राट ठेकेदारांना दिले आहे. राष्ट्र खाजगीकरण होणार हे पक्के राष्ट्रध्वज निर्मिती आयोगाचे अधिकार ठेकेदारांना देण्यात आले.” स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सव सोहळ्या दिवशी राष्ट्रध्वज छपाई आयोगाचे कंत्राट ठेकेदारांना देवून खाजगीकरण प्रक्रीयेत भारतीयांना गुलामगिरित ढकलण्याचा चांगला सोहळा करित आहेत.
त्यांचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि यावर भारतीयाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आपण नकळत कसे कधी विकले गेलो हे कळलेच नाही. खाजगीकरणावर भर असलेलं हे सरकार अद्याप पर्यंत 450 सरकारी संस्था विकून बसली आहे. एलआयसी, रेल्वे, विमान, बँकिंग सर्व खाजगीकरण केलं गेलं. आणि ध्वज छापण्याचे काम सरकारी आहे, त्याचे सर्व अधिकारी खादी आयोगाकडे आहेत मग गुजरात सुरत अहमदाबाद मधील खाजगी कंत्राटदारांना कंत्राट कसे काय दिले? हा प्रश्न चक्रावून टाकणारा आहे. याचाच अर्थ राष्ट्रध्वज छपाई जर कंत्राट तत्वावर झाली असेल तर देशाचे अमृत महोत्सवी वर्षी अधिकृत खाजगीकरण झाले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापुढे खादी ग्रामोद्योग राहील की नाही याची शंका निर्माण झालेली आहे असे मत या पोस्टचे विश्लेषण करताना पँथर स्टूडेंट फेडरेशनचे राज्य अध्यक्ष अनिकेत साबणे यांनी केले आहे.