चळवळ

ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येकी भूमीहीन शेतमजुरांना 25 हजाराची मदत द्या – दिपक केदार

Subscribe | Like | Comment | Panthernama

पुणे : विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण गाजले. शेतकरी आत्महत्या, ओला दुष्काळ जाहीर करून 50 हजार प्रती हेक्टरची मदत करण्याची मागणी त्यांनी जोरात लावली. याच भूमिकेचा धागा धरून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी विरोधी पक्ष नेता व मुख्यमंत्री या दोघांना टार्गेट केले आहे. शेतीत पाणी साचले, ओला दुष्काळ, महापूर यात तुम्ही सगळे शेतकऱ्यांच्या हिताचे बोलत आहात तुम्ही याच शेतीवर आधारित मागासवर्गीय भूमिहीन मजुरांचा विचार का करत नाहीत. त्याला आठवडी बाजार नाही, त्याच्या आत्महत्येची नोंद सुद्धा होत नाही. संवेदन मनाने कधीही कोणत्याही मंत्र्यांनी आमची बाजू मांडली नाही. तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून भूमिहीन मजुरांना 25 हजार प्रत्येकी मदत जाहीर करावी, मागासवर्गीय बेरोजगारांना 10 हजार रुपये भत्ता देण्यात यावा अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी केली आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!