महाराष्ट्रात लव्ह जिहाद नाही, हिंदु मुस्लिम दंगली पेटवू पाहणाऱ्या नवनीत राणाला अटक करा! दिपक केदार

अमरावती : लव्ह जिहाद नावाचं भूत महाराष्ट्रात आलंय त्या नावाखाली येणाऱ्या निवडणूका लढण्याचे संकेत दिसत आहेत. हिंदु मुस्लिम दंगलीला पोषक वातावरण करण्याचे काम खासदार करताना दिसत आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम विरोधी भूमिका घेऊन त्या हिंदु विरुद्ध मुस्लिम असे वातावरण बनवत आहेत.
हिंदु मुलगी घरच्यांवर रुसून सातारा गेली नवनीत राणाने मुलीचे अपहरण मुस्लिम तरुणाने केल्याचा कांगावा केला. माझा मोबाईल रेकॉर्ड केला म्हणून डीसीपी ला धारेवर धरले त्यांच्या दिशेने रिमोट सुद्धा फेकले. आमच्या हिंदु मुली उध्दवस्त केल्या जात असल्याचे भडक स्टेटमेंट केले. अमरावती कमिशनर यांनी घटनेचा पर्दाफाश केला आणि मुलीचा शोध घेऊन सत्य पुढे आणले. मुलीने स्टेटमेंट दिले की मी घरच्यांवर रागावून सातारा निघून गेले होते, माझ्या मागे नवनीत राणाने माझी बदनामी केली असा आरोप तिने केला. हिंदु मुलींच्या चारीत्र्यावर संशय घेणे हा नवनीत राणाने हिंदु मुलींचा केलेला अवमान नाही का?
यावर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी प्रतिक्रिया दिली. मेळघाट आदिवासी भागातून सर्वाधिक मत मिळवलेल्या नवनीत राणा त्या आदिवासींवर हल्ला होतो तेंव्हा असा थयथयाट करत नाहीत. आपला नेता मुख्यमंत्री झाला नाही आणि आपल्या पतीला मंत्री पद मिळालेले नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणून भाजप राज्याला अस्थिर करताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत त्यानी आपल्या सहकाऱ्यांना आवरावे तुमच्या राजकीय महत्वाकांक्षी पोटी गरीबांचे लेकरं धार्मिक दंगलीत मारू नका. येणाऱ्या निवडणुकीत हिंदु मुस्लिम हाच अजेंडा आहे काय? उत्तरप्रदेश चे थेर इकडे आणू नका इकडे लव्ह जिहाद औषधाला नाही. नवनीत राणा यांनी जे घडवलं त्यात महाराष्ट्र उद्धवस्त झाला असता त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. त्यांच्या जाग्यावर एखादा दलित नेता असता तर आतापर्यंत 353 दाखल झाला असता. नवनीत राणा साठी केंद्रातून कोण मदत करतोय हा प्रश्न आहे. त्यांना आवर घालावा अन्यथा त्यांचा कार्यक्रम दंगली घडवण्याचा दिसतोय. ज्या संघटना 2006 ला नांदेड मध्ये बॉम्ब बनवता बनवता ब्लास्ट झाला ज्यात दोन आतंकी जागेवर मेले त्या संघटनेने अमरावतीत वातावरण दूषित केले आहे. विश्व हिंदू परिषद ही संघटना बलात्कारांचा जयजयकार करणारी संघटना आहे, त्यांना पेढा, त्यांना हार घालणारी संघटना आहे. अशा संघटनेवर लक्ष ठेवावे, बंदी घालावी. आम्ही कालच्या घटनेचा निषेध करत असून त्या हिंदु मुलीच्या झालेल्या चारित्र्याचे हनन मोठे आहे तिला तात्काळ शासकीय नोकरी दिली पाहिजे तिचे मनोबल वाढवले पाहिजे. ज्या निरपराध मुस्लिम तरुणाला विनाकारण वेठीस धरले त्या तरुणाचे सुद्धा सामाजिक पुनर्वसन झाले पाहिजे त्याची अब्रू नुकसानीची भरपाई खासदाराने दिली पाहिजे. राणा यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी आहे.