“निळा जनउठाव” महामोर्चा ची राज्यभर चर्चा!

औरंगाबाद : ऑल इंडिया पँथर सेनेनी 30 सप्टेंबर 2022 रोजी क्रांती चौक औरंगाबाद ते विभागीय आयुक्त कार्यालय येते निळा जनउठाव महामोर्चा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्त्वात काढण्याचे जाहीर केले.
मोर्चाची राज्यव्यापी तयारी सुरू असून मोर्चाला लाखों आंदोलक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दलित अत्याचाराने देशभर थैमान घातले असून दलितांच्या मरण्याला किंमत राहिलेली नाही. कुत्र्या मांजरा सारखं आमचे हाल झालेत. माणूस म्हणून जगू दिले जात नाही. औरंगाबाद सारख्या चळवळीच्या क्रांतिभूमीत 15 दिवसात बौध्द मातंग दोघांचे डोक्यात कुराड घालून हत्याकांड झालं. राजस्थान जालोर केवळ दलित विद्यार्थ्याने शिक्षकाच्या मतक्यातल पाणी पिल्ला म्हणून त्याला मारून टाकले नऊ वर्षाच्या चिमुरड्याला जात काय कळणार? दीक्षा वाठोरे ला विष पाजून मारले. अशा शेकडो घटना देशभर घडल्यात त्या संतापजनक आहेत. अनुसूचित जाती जमातीचे आदिवासी समूहाचे अस्तित्व धोक्यात आणणारे आहेत.
दलित अत्याचार, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, बेरोजगारी, भूमिहीन मजूर, कामगार, विद्यार्थी सर्वांच्या जवळपास 50 मागण्या घेऊन ऑल इंडिया पँथर सेना राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे. आंदोलनात राज्यभरातून कार्यकर्ते स्फूर्तीने येणार आहेत. जातीय जुलुमा विरोधात अभूतपूर्व बंड पुकारला जाणार आहे.
निळा जनउठाव केंद्र व राज्य सरकार विरोधात असून व्यापक देशव्यापी भूमिका घेऊन मैदानात उतरला आहे. या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, महाराष्ट्र प्रवक्ते बंटीदादा सदाशिवे, सचिन तीवरी महाराष्ट्र महासचिव यांनी केले आहे. सर्व औरंगाबाद कार्यकारिणी मोर्चा यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस महेनत करत आहे.