राजेंद्र पाल गौतम यांना ऑल इंडिया पँथर सेनेचा पाठींबा!

औंगाबाद : विजयादशमी हा दिवस भारतीय बौध्द समुहांसाठी नवा जन्म आहे. दिल्लीला राजरत्न आंबेडकर आणि आम आदमी पार्टीचे मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी 10 हजार नव्या नव बौद्धांना धम्मदीक्षा दिली यावेळी सामूहिक बौध्द धम्माच्या 22 प्रतिज्ञा झाल्या यात पहिलीच प्रतिज्ञा मैं ब्रह्मा विष्णू महेश को भगवान नहीं मानुंगा अशी ती प्रतिज्ञा होती. या प्रतिज्ञेचा व्हिडिओ जबरदस्त वायरल झाला आणि लगेच मनुवादी विचाराच्या भाजपने याला राजकीय धार्मिक मुद्दा केला. केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पार्टीला टार्गेट करण्यात आले आणि पार्टीने सुद्धा राजेंद्र पाल गौतम यांची साथ सोडली त्यामुळे त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार राजेंद्र पाल गौतम यांच्या सपोर्ट साठी समोर आले आहेत. त्यांनी ट्विटर फेसबुक पोस्ट करून राजेंद्र पाल गौतम यांना पाठींबा दिला आहे आणि केजरीवाल यांचा निषेध सुद्धा केला आहे. त्यांनी म्हंटले की केजरीवाल यांचा खरा चेहरा समोर आला असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो केवळ मतासाठी वापरला, बौध्द असेल तर त्याला 22 प्रतिज्ञा म्हणाव्याच लागणार हा धर्म स्वातंत्र्य अधिकार संविधानाने बहाल केलेला आहे त्यामुळे 22 प्रतिज्ञा बौध्द म्हणत असतो. धार्मिक मुद्दा झाल्यामुळे केजरीवाल यांच्या दबावामुळे राजेंद्र पाल गौतम यांना राजीनामा द्यावा लागला हे निंदनीय आहे. आम शब्द काढून त्याठिकाणी हिंदुत्व आदमी पार्टी असे नाव त्यांनी करावे. दिल्लीत हिंदु मुस्लीम दंगल झाली, धर्म संसदेत भागवे संविधान दाखवले केजरीवाल यांनी तेव्हाही भूमिका घेतलेली नाही याचा अर्थ येते केजरीवाल सुद्धा हिंदुत्ववादी आहेत. ऑल इंडिया पँथर सेना पुढच्या वर्षी करोडो लोकांना ही शपथ घ्यावी आम्ही राजेंद्र पाल यांच्या पाठीशी आहोत त्यांनी देश भारत बौध्दमय करण्यासाठी प्रयत्न करावेत. भाजपने नौटंकी करू नये त्यांना महागात पडेल अशा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.