डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रति कमान हटवा अन्यथा आम्ही ती पाडून टाकू – दिपक केदार

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येते प्रति कमान निर्माण करून संघाचे हस्तक असलेले कुलगुरू नामांत्तर लढ्याचा अवमान करत आहेत. एक ऐतिहासिक कमान असताना दुसरी 20 फुटांवर कमान निर्माण करण्याची गरज काय? तात्काळ ही दुसरी कमान त्यांनी माफी मागून पाडून टाकावी अन्यथा आंदोलन करून पँथर स्टाईलने आम्ही ती पाडून टाकू अशा इशारा देत आहे.
17 वर्ष संघर्ष केल्यावर आम्हाला कमानीवर नाव देता आले, त्या कमानिला पाडण्याचे षडयंत्र जर कुणी केले तर ते हात आम्ही सोडणार नाहीत. कुठे तरी बुद्ध लेणीकडे जाणारा मार्ग बंद करायचा आहे का? लाखों लोक 14 जानेवारीला येते अभिवादन करायला येतात त्यांना रोखायचे आहे का? कुलगुरूंनी आधी नामांतर शहिदांचे स्मारक उभा करायला हवे, आम्हाला याधीचे कुलगुरू चोपडे यांनी आश्वासन दिले की छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत नामंत्तर शहिदांचे स्मारक सोबतच होईल अद्याप झाले नाही.
17 वर्ष संघर्ष केला आणि कमान राजकारण होत असेल तर आंबेडकरी जनतेमध्ये संताप आहे, हे केंद्र आमच्या अस्मितेचे अस्तित्वाचे केंद्र आहे. याच भान कुलगुरूंनी ठेवावे.
उस्मानाबाद विद्यापीठ उपकेंद्र येते कमान निर्माण करा, तिथे पुतळा निर्माण करा. पुढील आठ दिवसात ही दुसरी कमान पाडावी अन्यथा आंदोलन करून तिला उध्दवस्त करू अशा इशारा देत आहोत.
शैक्षणिक केंद्र असलेल्या या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव आहे येते दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे पण राजकीय अड्डा झाला आहे, जाणिवपूर्वक हा खेळ केला जातो. छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाने वसतिगृह आहे त्याची अवस्था बिकट झालेली आहे. विद्यापीठातील वसतिगृह सुसज्ज करावेत पुतळ्याचे राजकारण दुर्दैवी आहे.
महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे सुद्धा शहरात मोठे उंच भव्यदिव्य झाले पाहिजेत ही आमची भूमिका आहे.
असे मत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी व्यक्त केले.