मीडियाने आपसात कोंबडा झुंज लाऊन दिली – दिपक केदार

औरंगाबाद : रामदासजी आठवले यांचे विधान मीडियाने चुकीचे दाखवले. काही भूमिकांवर शंका घेता येत नाही, अनेक विहारांचे उद्घाटन त्यांनी केलेले आहेत. त्यांच्या मंत्री पदाचा फायदा हा आंबेडकरी बौद्ध कार्यकर्त्यांना होत आहे. त्यांची भाजपशी राजकिय युती आहे तरी देखील त्यांनी दोन महिन्यापूर्वी भारतातले भारतीय 2500 वर्षांपूर्वी बौध्द होते असे धाडसी विधान त्यांनी केले ते मीडियाने दाखवले नाही. मीडिया आमच्यातली आमच्यात भांडण लावत आहे. मीडिया आमच्या दलित अत्याचार, सामाजिक मुद्द्यांवर बोलत नाही त्यामुळे आम्ही काही बाबींवर बोलणार नाहीत. पूर्ण प्रेस ऐकल्यावर कळते ते विधान अनवधानाने निघाले असावं त्यांचं सर्व कार्य बौद्धांसाठी असते हे नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही तटस्थ आहोत.
मीडियाने आमच्यातली आमच्यात कोंबडा झुंज लावण्यासाठी मोडून तोडून दाखवले. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी स्टेटमेंट दिले होते की, 2500 वर्षांपूर्वी सर्व भारतीय बुधिस्ट होते ते स्टेटमेंट मीडियाने का दाखवले नाही?
असे मत आजच्या पत्रकार संवाद मधून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी मांडली आहे.