चळवळ

सावरकरलाच का? शहीद भगतसिंग यांना भारतरत्न द्या – दिपक केदार

राहुल गांधींच्या स्टेटमेंट नंतर राज्यात सावरकर वाद सुरू असताना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी ट्विट करून लक्षवेधी मागणी केली आहे.

शिवसेना, भाजप, मनसे सातत्याने सावरकर ला भारतरत्न देण्याची मागणी करतात. सावरकरांच्या इतिहासावर अनेक आक्षेप नोंदवले जात आहेत, त्यांच्या क्रांतीवीर असण्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्तित्थ झालेले आहेत.

भगतसिंग शहीद झाले, त्यांच्या क्रांतीवीर असण्यावर कुणाचीही शंका नाही मग भाजप, सेना, मनसे भगतसिंगाना भारतरत्न द्या अशी मागणी का करत नाहीत असे ऑल इंडिया पँथर सेनेनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

येणाऱ्या काळात ऑल इंडिया पँथर सेना भगतसिंग यांना भारतरत्न देण्या संदर्भात मागणी करणार आहे त्यासाठी आंदोलन सुद्धा छेडणार असल्याची माहिती पँथरनामा शी बोलताना दिपक केदार यांनी दिली.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!