रास्वसं मुखपत्र धार्मिक गरळ ओकत आहे, भीमराव रामजी आंबेडकर मधील रामजी का वापरात नाही असा सवाल त्यांनी या अंकात लेख लिहून केला आहे!

पुणे : पांच्याजण्या मुखपत्र हे संघाचे अधिकृत मुखपत्र आहे. देशातील मूलभूत प्रश्न शेतकरी, महागाई, बेरोजगारी, भुकमारी असा प्रश्नावर एखादे आर्टिकल येते कधी छापून आलेले नाही. सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रयोग या माध्यमातून होत असतात. सांस्कृतिक, धार्मिक आतंक निर्माण करण्याचे काम सुरू असते.
प्रो. प्रसादकुमार वर्मा नामक इसमाने या अंकात एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी भीमराव रामजी आंबेडकर मधील रामजी का लिहित नाहीत वापरत नाहीत अशा प्रश्न निर्माण केला आहे. रामजी ना ते त्यांच्या श्रीरामाशी जोडण्याचं प्रयत्न करत आहेत. एवढंच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना त्यात सही केली आणि ती भीमराव रामजी आंबेडकर अशी केल्याचा हवाला ते देतात त्यामागे जे कारण त्यांनी लिहिलं ते वाचून मस्तक हलाल की या लोकांना झालंय काय?

उघड उघड तो म्हणतो की रामजी नाव हे क्षेत्रीय संस्कृतीतल आहे, सनातन परंपरेतले आहे व समरसता टाकावी म्हणून बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक पूर्ण नाव लिहिले असे सांगण्याचा प्रयत्न केला.

क्षत्रिय म्हणजे विषमता, सनातन धर्म म्हणजे वैदिकता, समरसता म्हणजे संघनिती या तिन्ही ला जोडण्याचे काम त्यांनी केलं याचं ऑल इंडिया पँथर निषध करत आहे.
त्याविरोधात ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी संघाची कानउघडणी केली असून इशारा सुद्धा दिला आहे.