चळवळ

लातूर लोकसभेतून दिपक केदार लढणार?

लातूर : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी सोशल मीडियातून लातूर लोकसभा लढण्या संदर्भात भूमिका जाहीर केली आहे. अनुसूचित जाती राखीव मतदार संघ असलेल्या लातूर मधून युवा लढाऊ चेहरा आजवर मिळालेला नाही. दोन कुटूंबशाही लातूरमध्ये राजकीय गणिते ठरवतात. लोकप्रतिनिधी हा त्यांच्यापुढे गुलाम होईल अशा अनुसूचित जातीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू असतो. स्वाभिमानी एकही चेहरा आजवर लातूर मध्ये लाभला नाही. आंबेडकरी समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समूह मोठ्या प्रमाणात लातूर जिल्ह्यात आहे पण यांचं खरं प्रतिनिधित्व करणारं नेतृत्व येते उभा राहिलेलं नाही.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी या भागात दलितांवर हल्ले होताच धावून येण्याची भूमिका घेतलेली आहे. अश्विनी सूर्यवंशी हत्याकांड झालं तेव्हा कोरोनाच्या काळात दिपक केदार यांनी 25 हजार लोकांचा मोर्चा काढून जातीयवादी प्रवृत्तींना वठणीवर आणले होते. तेव्हापासून जिल्ह्यात प्रस्तापित राजकीय नेते दलित अत्याचाराला गांभीर्याने घेऊ लागले. लातूर शहर ग्रामीण, देवणी, चाकुर, अहमदपूर, निलंगा, औसा, लोहा, कंधार, शिरूर अनतपाळ, उदगीर सर्व टलुक्यात ऑल इंडिया पँथर सेनेची मोठी ताकद असल्याचे जिल्हा अध्यक्ष कुणाल इंगळे यांनी सांगितले.

त्यामुळे दिपक केदार हेच लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार असले पाहिजेत अशी चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच दिपक केदार यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे ते बुलढाणा निवडणूक फॉर्म भरू शकले नाहीत.

काल त्यानी सोशल मीडियात व्हिडिओ काढून भूमिका जाहीर केली. कुणाल इंगळे हे बैठक घेऊन आढावा देतील आणि दोन दिवसात लातूर निवडणुकी संदर्भात भूमिका जाहीर केली जाईल अशी मत त्यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया पँथर सेनेची कोअर कमिटी बैठकीत दिपक केदार हे कार्यकर्तुत्वान नेते आहे. पाच वर्ष घरात बसून ऐन निवडणुकीत पुढे आलेल्यांसारखे नेते नाहीत. त्यांना कुणी साथ देत नसले तरी आपण कार्यकर्त्यांनी आणि समाजाने ताकदीने दिपक केदार यांना संसदेत पाठवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांनी मांडली आहे.

दिपक केदार मैदानात उतरावे यासाठी लातूर मतदार उत्सुक आहे. कालच विद्यमान खासदार यांना एका गावात प्रचार दरम्यान लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही दलित अत्याचार झाले तेव्हा कुठे होतात. त्यामुळे दिपक केदार यांच्या बाजूने नक्कीच भावना आहेत, संकटात तेच धावून आलेले आहेत.

काँग्रेस चा उमेदवार दलित अत्याचार, मुस्लिम अत्याचार,महिला अत्याचारावर कधीही बोलेला नाही. भाजपा तर लांबवर संबंध नाही, अशावेळी दिपक केदार हेच एकमेव धावून येणारं नाव आहे. राज्यभरातून एक पँथर संसदेत जावा यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते सर्व ताकदीने लढतील असे चित्र आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!