तुमच्या मताची आता बोली लावू देऊ नका – दिपक केदार

बुलढाणा :
तुमच्या मताची बोली आता लावू देऊ नका!
येते आजवर आम्हाला गृहीत धरले गेले पण आमचे प्रश्न कुणीच सोडले नाहीत. सत्तर वर्ष गायरान प्रश्न सुटला नाही, भूमिहीनांना जमिनी मिळाल्या नाहीत, हाताला काम मिळाले नाही, नोकर्यातला अनुशेष भरला नाही, बेरोजगारी ने आपल्याला संपवले, जातीयतेच्या नावावर आपल्याला वाळीत टाकले जातयं, मारलं जातंय पण आपला प्रश्न संसदेत नाहीत विधानभवनात नाही.
त्यामुळे आता आमच्या हक्क अधिकारच काय हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे. दोन आमदार खासदार झाल्याने फक्त निराशा पदरी पडली समाज तशाच खितपत पडला आहे. आता तरी मानसिक गुलामगिरी सोडा आणि मताची किंमत ओळखा ही मताची किंमत ज्या दिवशी तुम्हाला समजेल त्या दिवशी आपण झुकलेलो नाही तर झुकवणारे झालेलो असेल.
तुमच्या साठी लढतोय म्हणून मला घेरल जातय पण आता मला पँथर चळवळीला रोखणं शक्य नाही. गाव ते दिल्ली देशभर लहान थोरात एकच चर्चा सुरू असते ऑल इंडिया पँथर सेना…
मेहकर पिंपरीमाळी शाखा स्थापना वेळी मत व्यक्त केले.
माझ्या आया बहिणींचं हे काळजी घेणं कधीच विसरणार नाही असे ठणकावून सांगितले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित काकडे, पंकज वाघ, विनोद जाधव, सचिन मुळे, वाजेद शेख, समाधान वानखेडे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते