चळवळ

बुलडोजरने घर पाडा, मालमत्ता जप्त करा – दिपक केदार

श्रीरामपुर : कबुतर चोरीच्या संशयावरून हारेगाव दलित मुलांच्या अमानुष छळाचा निषेध सुरू झालेला आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर येते जाऊन पीडित दलित मुलांची भेट घेतली, डॉक्टरांशी चर्चा केली, त्यांच्याकडून घटनेचा तपशील घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन गावात एंट्री केली. गाडीवर उभा राहून जबरदस्त पँथर डरकाळी त्यांनी फोडली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, हा सुनियोजित कट आहे, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात आणि आता महाराष्ट्र लघवी कांड घडले आहे. लहान लेकरं तुम्ही डांबून मारता तुमच्या पार्श्व भागात दम असेल तर आता बाहेर या. रिक्षावाला मुख्यमंत्री म्हणून गप्प राहिलो पण हा मुख्यमंत्री आनंद दिघे यांच्यासारखाच जातियवादी आहे, त्यांच्यात बदल होत नाही. आठ महिन्यात एकाही अत्याचाराला भेट नाही, धर्मवीर २ लॉन्चिंग साठी वेळ आहे पण झाडाला टांगून दलित तरुणांना मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलेली असताना ते भेटायला येत नाहीत. जेव्हा जेव्हा फडणवीस गृहमंत्री होतात, तेव्हा तेव्हा भिमाकोरेगाव सारखे अत्याचार कसे काय होतात? ते सात वर्षात एकही घटनेबदल बोलले नाहीत, ते गृहमंत्री आहे की मी? मलाच गृहमंत्र्यांचे काम करावे लागत आहेत. दलितांचे रक्षण हे त्यांचं काम नाही का? या दोघांनी एकदा जाहीर करावे की हे सरकार दलित, आदिवासी, मुस्लिमांचे आहे की नाही. आता आम्ही शांत बसणार नाहीत त्यांनी तात्काळ भूमिका घ्यावी, भेट द्यावी अन्यथा महाराष्ट्र बंदची हाक देऊ मग त्याचे परिणाम वाईट होतील.

पीडित मुलांच्या शिक्षणाची व सरकारी नोकरीची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्यांना आत्मसन्मान स्वाभिमान सरकारने मिळवून द्यावा.

उत्तरप्रदेश मध्ये मुस्लिमांचे घरे बुलडोझरने पाडल्याचे व्हिडिओ भाजप महाराष्ट्र वायरल करत असतात. आता फडणवीस यांनी तात्काळ या आरोपीची मालमत्ता जप्त करून घरावर बुलडोझर चालवावे.

या दहा वर्षात झालेले दलित अत्याचार उघड करण्यासाठी समिती गठीत करावी. सर्व आंबेडकरी नेत्यांची विशेष बैठक मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या नेतृत्वात बोलवून दलित अत्याचार रोखण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी.

अहमदनगर जिल्ह्यात सोनई, शिर्डी, खर्डा, जवखेडा आणि आता श्रीरामपुर हत्याकांड झाले आहेत. त्यामुळे हा जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जिल्हा घोषित करावा.

मनुवादी दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत आपण सतर्क व्हावं, प्रवृत्तीला हिसका दाखवून देऊ. आपल्याला धमकवले जात आहे, आपल्याला संपवलं जात आहे. आपण येणाऱ्या काळाला आपला काळ केला तरच अस्तित्व टिकेल.

मी गृहमंत्री असतो तर या प्रवृत्ती नागड्या फिरवल्या असत्या, फडणवीस यांनी दोनच दिवस नायक फिल्म सारखं गृहमंत्री द्यावं, बघा जातीयवादी कसे सरळ करतो, तो उंदरा सारखा मिश्यावाला सुद्धा सोडणार नाही.

पोलिसांचे हात बांधले गेले आहेत. या भागात काहीही झाले तरी विखे अन् थोरात शिवाय ते पुढे ढकलत नाही. त्यामुळे पोलीस शांत आहे, त्यांच्या दांडकुच्या वापर होऊ दिला जात नाही. हे निंदनीय आहे.

यावेळी त्यांनी राज्य सरकारला टार्गेट केलं असून यापुढे लढा तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

हजारों कार्यकर्ते गावात धडकले त्यामुळे पोलिसांना तात्काळ मोठा फौजफाटा वाढवावा लागला. दिपक केदार येणार याची चर्चा होताच दुकान बंद करण्यात आल्याचे चित्र श्रीरामपूर शहरात दिसले.

यावेळी महाराष्ट्र प्रवक्ते बंटीदादा सदाशिवे, जिल्हा अध्यक्ष योगेश थोरात, राम दारोले, अतुल भिंगारदिवे, सागर कांबळे, करूणा मोकळ इत्यादी उपस्थित होते.

दिपक केदार यांच्या जबरदस्त धडकिमुळे श्रीरामपूर हादरले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या संतापाच्या क्लिप आता सोशल मिडियात वायरल होत आहे. केदार यांच्या आक्रमक आणि ताकदीने आलेल्या कार्यकर्त्यांमुळे राज्यभर मोठी चर्चा सुरू झालेली आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!