महाराष्ट्रात सुद्धा मणिपूर; भर चौकात महिलेवर हल्ला, अत्याचार

सातारा मान तालुक्यातील घटनेनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. मातंग महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वैरणीचे पैसे मागितले म्हणून चार जातीय गुंडांनी ही मारहाण केली. भर चौकात मारहाण सुरू होती आणि शेकडो लोक ते बघत होते, काही मोबाईलने शूटिंग करत होते. तुमच्या आया बहिणी असत्या तर अशीच बघ्याची भूमिका घेतली असती का?
मणिपूर नंतरची सर्वात मोठी घटना ही आहे. त्या घटनेत आणि या घटनेत फरक नाही. त्यावरही सरकार बोललं नाही आणि यावरही सरकार बोलणार नाही.राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही.
ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे तात्काळ सर्व आरोपींना अटक करावी, त्या महिलेला चांगल्या दर्जाच्या दवाखान्यात इलाज करावा, 25 लाखांची मदत सरकारने करावी. पोलीस संरक्षण द्यावे.
महापुरुषांचा महाराष्ट्र मानवतेचा महाराष्ट्र उद्धवस्त झाला आहे. संवेदना राहिलेल्या नाहीत. आजही दलित महिला खाली पाडून मारल्या जात आहेत ही मानसिकता संपलेली नाही. चंद्रावर यान गेलं पण पृथ्वीवरील महिलांचं गुलामपण गेलं नाही.
या घटनेचा निषेध करतो तात्काळ आरोपीला अटक करावी. आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहोत. कुणाचीही गय करू नये बघणाऱ्याना नराधम घोषित करून त्यांना सुद्धा सहआरोपी करावे अशी मागणी आम्ही करत आहोत.
मी लवकरच या पीडित महिलेला भेटायला येतोय!
अशा आशयाची पोस्ट ऑल इंडिया पँथर सेना दिपक केदार यांनी केली आहे.