अग्रलेखचळवळ

आजच्या निर्बुद्ध हलक्या डोक्याचं अन् कच्च्या कानाचं हसू येतं!

संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्यांनी, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हिंदुत्वाच्या कर्मठतेत उतावीळ होऊ नये. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांनी देशविरोधी घोषणा दिल्याचा खोटा प्रचार केल्यानंतर तात्काळ राज्याच्या प्रमुख नेत्यांनी धमकी, द्वेष त्यांच्या प्रतिक्रियातुन दाखवला तो घातक आहे. जबाबदार संवैधानिक पदावर बसलेल्यानी निदान पोलिसांच्या रीपोर्टची वाट तरी पहायची असती, सरकारने बोलताना हातात रिपोर्ट घेऊनच बोललं पाहिजे, समाज माध्यमे सरकारचा रिपोर्ट होऊ शकत नाहीत. मोठी भूमिका घेण्याआधी सत्य पडताळणी तर करायची असते?

पोलिसांच्या संरक्षणात आपलं कुटुंब घेऊन बसलेल्या एकाने तर पत्र काढून हे थेर, तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात जा, असले धमकीचे पत्रच काढले. पुणे पोलिस म्हणातायत घोषणा दिल्याचं नाहीत.
एडिटिंग दुनियेत वास्तव बघावं असं कुणालाच वाटत नाही, एडिटर सॉफ्टवेअरने सुप्रिया सुळे मुख्यमंत्री केल्या, तर व्हिडिओ एडिटिंगने पाकिस्तानचा नारा, पीएफआय च्या गर्दीत घुसवला याचं साधं भान सुद्धा आम्हाला राहिले नाही. आजच्या निर्बुद्ध हलक्या डोक्याचं अन् कच्च्या कानाचं हसू येतं. रात आंधळ्या ऐकल्या होत्या पण धर्म आजाराने माणसाला दिवसा आंधळ्या आल्यात.

एनआयए च्या अनेक कारवाया कोर्टात निष्क्रिय ठरलेले उदाहरण आहेत. 8 वर्ष जेलमध्ये आतंकी म्हणून टाकलेले तरुण कोर्टाने निर्दोष सोडल्याचे उदाहरण आहेत. त्यामुळे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया जी संघटना संविधान बचाव म्हणते, Save Republic म्हणते, जिच्या झेंड्यात तिरंगा आहे, दलित, मुस्लिम, शेतकऱ्यांचे आंदोलन करते त्या संघटनेला आज टार्गेट केलं आहे. जुने काही उदाहरण पाहता हे कोर्टात सिद्ध झालं तरच आजच्या कार्यवाहीला अर्थ राहणार आहे. मुस्लिम संघटनांना आज अचानक धाडीला सामोरे जावं लागतं आहे.

दुसरीकडे आतंकवादाचे ठोस पुरावे असताना धाडी पडत नाहीत. नांदेड बॉम्बस्फोट 4 एप्रिल आणि 5 एप्रिल 2006 च्या मध्यरात्री एका RSS कार्यकर्त्याच्या घरी झाला होता, ज्यात बजरंग दलाशी संबंधित दोन तरुण जखमी झाले होते. नांदेड न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्रात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) माजी कार्यकर्त्याने आरोप केला आहे की RSS, विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल यासारखे हिंदू उजवे गट भाजपच्या राजकीय फायद्यासाठी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतले आहेत. मुंबईतील ४९ वर्षीय यशवंत शिंदे यांनी नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात विहिंपचा एक नेता आणि २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या अन्य एका व्यक्तीला आरोपी बनवण्याची मागणी केली आहे. हे त्याने कोर्टात प्रतिज्ञापत्र देऊन सांगितले आहे.
यावर कुणीच का प्रतिक्रिया देत नाही, एनआयए या संबंधित संघटनेच्या कार्यालयांवर धाडी का टाकत नाही? आतंकी आतंकी असतो त्याला जात धर्म नसतो हे साधं गणित आपण विसरलोय का?

काल किती पटापट प्रतिक्रिया आल्या, चार मुस्लिम एकत्र आले की ते देशाच्या विरोधात एकत्र आले हे कुणी पेरले. आमच्या देशातील मुस्लिम अशी घोषणा देणारच नाही हा दृष्टिकोन झाला की यात एडिटिंग वाले, आत घुसून घोषणा देणारे आपण ट्रेस करू शकतो. मग काल भाजप संघाचे प्रमुख मोहन भागवत मस्जिदेत गेले अन् आज त्यांच्या व्यवस्थेने मुस्लिमांना शंकेच्या नजरेतून टार्गेट केले.

कालच्या प्रतिक्रियांबद्दल माफी मागावी, काही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रात हिंदु मुस्लीम दंगली घडवण्याचा अजेंडा तुमच्या उतविळतेतून दिसून आला आहे. अमरावतीला लव्ह जिहाद झालं म्हणत प्रयत्न झाला तो ही पोलिसांनी हाणून पाडला, काल पुण्यात तो प्रयत्न झाला पोलिसांनी तो हाणून पाडला.

राज्यकर्त्यांनी सत्तेत बसून महाराष्ट्र पेटवू नये, जेवढ्या तत्परतेने पाकिस्तान नाऱ्या विरोधात एक झालात तेवढ्या तत्परतेने शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये देण्यासाठी, बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी उतावीळता दाखवा, त्यासाठी आपल्या पक्षाचे लेटरहेड काळे करा. महाराष्ट्र पेटवण्यासाठी काळे करू नका.
आंधळ्या सारखी अवस्था निंदनीय आहे!

  • दिपक केदार
    राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!