मोहन भागवत आता पापक्षालन सोडा, सर्व स्वयंसेवकांना घेऊन बुद्ध धम्माची दीक्षा घ्या – दिपक केदार मुक्तिभूमितून कडाडले

येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी केलेल्या धर्मांतर घोषणेच्या यंदाच्या ८७ व्या वर्धापनदिनानिमित्त ऑल इंडिया पँथर सेनेची मुक्तिभुमि येवला या ठिकाणी जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी 22 प्रतिज्ञा सुद्धा घेण्यात आल्या ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी महत्त्वाच्या भूमिका मांडल्या व या सरकारला प्रश्न विचारले
• मोहन भागवत आता पापक्षालन करायला सांगत आहेत त्यांनी सगळं सोडावं अन् आपले स्वयंसेवक घेऊन बौध्द धम्माची दीक्षा घ्यावी, देशासहित जगाला बुद्ध धम्माची गरज आहे. देशभर धर्मांत्तर सुरू आहे, दीक्षा घेत आहेत, 22 प्रतिज्ञा घेत आहेत त्यामुळे घाबराट सुरू झालेली दिसते.
• मुख्यमंत्र्यांनी आमच्या दलित अत्याचार, गायरान जमीन, घरकुल सगळ्या सामाजिक आर्थिक स्वातंत्रवर भूमिका घ्या अन्यथा विराट मोर्चा मुंबईत घेऊन येईल मुंबई सोडून जाण्याची वेळ येईल अशा इशारा देतोय.
• दुसऱ्याचे वाचवण्यामध्ये आपले अस्तित्व धोक्यात जातंय, निळा झेंडा धोक्यात येत आहे. आपले डूबले तेंव्हा कुणी एक आले नाहीत. त्यांचं वाचवायला सगळे एकवटले असं वाटतं आता पक्षच उरला नाही.
• दिल्लीत 22 प्रतिज्ञा घेतल्या म्हणून राजेंद्र पाल गौतम यांची चौकशी केली, दिल्लीत हे घडले असेल येते घडणार नाही. महाराष्ट्रात आम्हाला कुणीच रोखू शकत नाही.
• ऊसतोड मजूर आजही खुल्यावर 6 महिने संडासला जातोय, कुठंय स्वच्छ भारत अभियान? ऊसतोड मजूर आया बहिणी कुणी नाहीत का? त्यांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार नाही का?
• सफाई कामगार हे सगळे दलित कसे काय? आम्हाला घाणीत मारण्याचे त्यांचे षडयंत्र आहे. उठा आज संकल्प करा आपण खूप महान आहोत, मी घानीतले काम करणार नाही हा संकल्प करा, शिका तरच आपण पुढे जाऊ ही मानसिक गुलामगिरी सोडा.
• मत विकू नका, आपण जिंकू फक्त आपण मत विकणार नाही, स्वाभिमान विकणार नाही, हा निर्धार करा. सगळीकडे निळ्या झेंड्याची सत्ता येईल.
• मी तुमच्यातला आहे म्हणून मला जाणीव आहे, म्हणून मी मरण्याच्या तयारीने मैदानात उतरलोय, ज्यांना भुईमुगाच्या शेंगा शेंड्यात की बुडक्यात हे माहीत नाही त्यांना आपल्या व्यथा काय कळणार?
• आपला उध्दार झाला नाही, कुणाला मंत्री पद कुणाला खासदारकी कुणाला आमदारकी मिळाली, पण आपल्याला घाणी तून बाहेर काढले नाही, आपल्याला रोजगार दिला नाही. 50 वर्षानंतरही आपण उध्दवस्त स्तिथित आहोत.
• आज आमचा नवा जन्म आहे, माणूसपण मिळालं, जनावरचे जिणे आज संपले.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले बाप आहेत कुणीच आपला बाप होऊ शकत नाही, आपल्याला विकत घेणाऱ्यांना सांगा तुझी आऊकात काय? चवदार तळ्याचे पाणी आम्हाला पाजले आहे.
• जातीमुळे आम्हाला मारलं जातंय, चांगले कपडे घालतो म्हणून बहिष्कार टाकला जातोय तेव्हा आजही आम्ही विचारतोय आमचं स्वतंत्र कुठंय?
• इंदुमिल स्मारक करा, भिमाकोरेगाव आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा मोठी भूमिका घेतली जाईल.
• अडिज वर्ष दलितांचे रक्त सांडत होते तेंव्हा मी एकटा वणवण फिरलो दिडसे घटनांना भेटी दिल्या, आज अचानक निवडणुकीच्या तोंडावर सगळे बाहेर आलेत त्यांना विचारतो समाजाचे रक्त सांडत होते तेव्हा तुम्ही कुठे होतात?
• संविधान वाचवायचे आहे, संविधान वाचवलं नाहीतर गुलामी येईल, ती गुलामी भयानक असेल. आज मी एवढी ताकद उभी केली की आमच्या संविधानाला हक्काला कुणी हात जरी लावला तर ते कलम केले जातील एवढी अफाट क्षमता आम्ही निर्माण केलेली आहे.
• कोणतीही सत्ता असो आमचे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे आता आपल्यालाच आपले अस्तित्व निर्माण करावे लागेल, निळा झेंडा पुन्हा फडकावा लागेल.
• यापुढे लग्नात गेलात, वाढदिवसाला गेलात कुठेही गेलात तर 22 प्रतिज्ञा द्या अन् अचारणात आणा तरच आपले जीवनमान प्रभावी होईल. घानितले काम सोडून आत्मसन्मान स्वाभिमान जागा करा.
• सगळ्या उज्ज्वला आई फसल्यात, आज लाकड वेचत आहेत देताना फ्री दिलं आता 1500 मागतोय म्हणतात. 15 लाख खात्यात येतील म्हणून जनधन अकाऊंट काढलं 1500 रुपये गरीबांचे लुटले त्यामुळे सतर्क व्हा आणि आपले माणसं निवडणूक द्या, मत विकू नका. फसव्या योजना, खोटे आश्वासन हे आता अजेंडा झालाय.
इत्यादी मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली…