बौध्द समाजावर बहिष्कार; हिंगोली पारोळा गावची घटनेने महाराष्ट्र हादरला!

हिंगोली पारोळा गावात बौध्द समाजावर बहिष्कार…
तीन ते चार वर्षांपासून गायरान जमिनीवर बुद्ध विहाराची नियोजीत जागा म्हणून बोर्ड लाऊन निळा व पंचशील ध्वज लावण्यात आला होता. आठ दिवसापूर्वी समाजकंटकाने दोन्हीं झेंड्याच्या बाजूला जाणिवपूर्वक भगवा झेंडा लावला, ठरल्याप्रमाणे पोलीस आले आणि सगळेच झेंडे काढून घेऊन गेले. समाज गयावया करत राहिला पण त्यांच्यावर दडपशाही दाखवून झेंडे काढले. पुन्हा समाजाने भंतेच्या हाताने झेंडा उभा केला, पुन्हा झेंडा काढण्यात आला आणि समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. किराणा देत नाहीत जीवनावश्यक वस्तू देत नाहीत.
ऑल इंडिया पँथर सेना हिंगोली पोलीस आयुक्त राज्याच्या गृहमंत्र्यांना मागणी करत आहे की तात्काळ बहिष्कार टाकलेल्या जातीय प्रवृत्तीवर अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही करावी, आरोपींना अटक करावी, जिल्हा अधिकारी तहसीलदाराने बहिष्कार उठवावा आणि संबंधितांवर कठोर कार्यवाहीचे आदेश द्यावेत. जाणिवपूर्वक निळ्या ध्वजाच्या बाजूला भगवा ध्वज लाऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा व कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करून जातीय दंगलीला खतपाणी घालण्याचा निंदनीय प्रकार करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी आम्ही करत आहोत.
संपूर्ण गावात अतिक्रमणात इतर धर्मियांचे स्थले आहेत मग बुद्ध विहाराचाच तिटकारा का? आजही सामाजिक बहिष्कार टाकून आमची सामाजिक नाकेबंदी केली जाते, आमच्या परिस्तिथीला हिणवलं जातं. आमचा कोंडमारा केला जातो. निंदनीय आहे दुर्दैवी आहे. प्रशासन यंत्रणा जातीयतेची बटिक झाली आहे.
समाजाचा हा अवमान आम्ही सहन करणार नाही, तात्काळ बहिष्कार उठवावा बहिष्कार टाकनाऱ्यांवर कार्यवाही करावी अन्यथा मी हिंगोलीत येऊन लाखों जनतेला रस्त्यावर उतरून उत्तर देईल याची गंभीर दखल घ्यावी.
75 वर्ष अमृतमहोत्सव हेच का आमचे स्वातंत्र्य?
संतापजनक घटनेचा धिक्कार असो!
राज्य सरकार होश मैं आओ!
ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी इशारा दिलेला आहे तात्काळ दखल घेण्याची मागणी केलेली आहे. पीडित कुटुंबांना ते बोलले असून त्यांना बहिष्काराचे व्हिडिओ मिळाले आहेत. हे प्रकरण गंभीर आहे.