वीज कोसळून तीन ठार; सरकार गप्पगार!

वीज कोसळून तिघांचे मृत्यु ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी मृताना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली!
वीज कोसळून तीन ऊसतोड मजुरांचा अंत झाला. यात एक चिमुरडी सुद्धा आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्तील पेठपिंपळगाव येतील व पानभोसी गावचे गरीब ऊसतोड मजूर ऊसतोडीसाठी बालाघाट कारखाना, अहमदपूर येते गेले होते. लोहा धावरी या घटनास्थळी हे मृतदेह आढळले.
पोचिराम गायकवाड (वय 40), रुपाली गायकवाड (वय 14)
इतर एकजण पानभोसी ता. लोहा येथील मयत आहे. एक गरोदर महिला सिरियस आहे.
कालच्या मुसळधार पावसात वीज कोसळली हे तिघे जागीच मृत्युमुखी पडले. राज्यसरकारने गटाच्या भांडणातून थोडा वेळ काढून महाराष्ट्रात डोकुन बघावं राज्य भयानक परिस्तिथीत आहे. ऑल इंडिया पँथर सेना ऊसतोड मजुरास भावपूर्ण श्रध्दांजली वाहत आहे.
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन पीडित कुटुंबातील सदस्याला आर्थिक मदत करावी. सर्व ऊसतोड मजुरांचा विमा उतरवला पाहिजे. सध्या कर्नाटक भागात भयानक पाऊस पडत आहे. कारखाने सुरू होण्या आधीच ऊसतोड मजुरांना घेऊन गेले आहेत त्यांना खोप्या सुद्धा टाकायला वेळ मिळालेला नाही. ते उघड्यावर बसलेले आहेत आणि कारखाने बंद आहेत या पावसात त्यांच मरण आहे. बचाव कार्य करावे, पंचनामा करून तात्काळ दखल घ्यावी आणि ऊसतोड मजुरांना सुरक्षीत करावे, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना करत आहे.
ऊसतोड मजुरा,
तुझे तडफडून मरण कुणाला दिसत नाही…
टिव्ही वर तुझी बातमी नाही…
सरकार मायबाप हे सुद्धा माणसं आहेत
अहो, हिंदु आहेत
तुमच्या हिंदुत्वात,
गरीब हिंदुच काय?
गरीब मजुरांच काय?
मोटर सायकलचा सुद्धा विमा असतो,
हे तर माणसं आहेत ना…
घडलेली निसर्गाची घटना नाकारता येतं नाही?
पण संवेदना आहेत की नाही?
मानवता आहे की नाही?
त्याला गुलामासारखे वागवू नका,
कारखान्यावर मजुरांना घर द्या,
त्याला सन्मान स्वाभिमान द्या,
स्वातंत्र्य झालाय ना भारत मग
भारतात आम्ही मजूर गुलाम का?
आमच्याकडे बघण्यास वेळ का नाही?
आम्ही माणसंच आहोत ना,
मग आमच्याकडे जनवरांसारखे का बघता?