किराणा नाकारला, बौद्ध समूहावर सामाजिक बहिष्कार टाकला! धुळे मेहरगाव प्रकरणाने महाराष्ट्र हादरला!

धुळे : मेहरगाव येते जतियातेतून बौद्ध समूहावर बहिष्कार टाकला आहे. पोळा सणाच्या दिवशी गावात महारांचे बैल कशाला, महार कधीपासून पोळा सण साजरा करायला लागले म्हणत विरोध केला त्यातून भांडण झाले. वायरल व्हिडिओ मधे एक गावगुंड हातात दांडा घेऊन मरताना दिसत आहे. या भांडणानंतर पोलीस स्टेशनला दोन्ही बाजूने गुन्हा दाखल झाला आहे.
अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला म्हणून तरुणांवर थेट दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करून पोलिसांनी या वादाला आणखी खतपाणी घातले. ज्यामुळे जातीयवादाचे बळ वाढले, आम्ही दांड्याने मारले तरी आम्हाला कुणी काही करू शकत नाही. यातून गावातील जात दांडग्याने बैठक घेऊन दलितांनी गुन्हा दाखल केला याविरोधात सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. एक महिला वायरल व्हिडिओ मधे व्यथा मांडत आहे. की गावात नेहमी प्रमाणे मी किराणा आणण्यासाठी गेले तर तिथे मला साबण देण्यास नकार दिला. किराणा दुकानातील महिलेने नकार देऊन सांगितले की मला दंड लागले तू येथून जा तुझ्या पाया पडते. पाया पडते या शब्दातून हे निश्चित होते की इच्छा नसताना त्यांना किराणा देण्यास मज्जाव केलेला आहे.
नाव्ही सुद्दा कटिंग करत नसल्याचे एका तरुणाने संगीतले. बौध्द समाज एकाकी पडला आहे. बहुजनांचा हा सण साजरा व्हावा यासाठी ते या सणात सहभागी झाले होते. बैलांना सुद्धा जात लाऊन काही समूह मोकळा झाला आहे.
अचानक या पोळा सणाला दलितांचे बैल रोखण्याचा प्रयत्न झाला राज्यात चार ठिकाणी बैल येशित येऊ दिला नाही, तोरणा खाली येऊ दिला नाही असे प्रकार तुम्ही महार आहेत म्हणत केले. यामागे सुनियोजित राज्यव्यापी मनुवादी कट दिसत आहे. आजवर राज्यात पोळा सणाला जातीयतेचे स्वरूप कधीच आले नाही. बौद्धांना यातून बायकॉट करायचे हे षडयंत्र होते.
1972 सारखी प्रतिक्रिया दिल्याचा व्हिडिओ या घटनेत वायरल होत आहे. जो आरोपी दांडा घेऊन समाजाला मारत होता, त्याला धुळे येथील भीमसैनिकांनी ठोसा दिला आहे. प्रतीकात्मक उत्तर त्यांनी दिलेले आहे आणि आरोपीला सुरक्षित पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी व्हिडिओ वायरल होताच भूमिका घेतली असती तर भीम सैनिक आक्रमक झाले नसते. राज्यात पोलिसांची बघ्याची भूमिका दुर्दैवी आहे. मेहकर प्रकरणी देखील व्हिडिओ वायरल झालेला असताना आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्याची भूमिका गृहखात घेत नाही, त्यातून सत्ता आमच्या बाजूने असल्या सारखे जातीय गुंड वागत आहेत. अशीच परिस्तिथी राहिली तर परिस्तिथी हाताच्या बाहेर जाऊ शकते याचं भान व्यवस्थेला आणि यंत्रणेला राहिले पाहिजे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते यांनी समाजाला शांतता राखण्याचे आव्हान केले आहे. लवकरच धुळे शहरात आक्रोश मोर्चा काढणार अशी त्यांनी फेसबुक पोस्ट टाकून इशारा दिलेला आहे. गावातील परिस्तिथी आता हळूहळू सुरळीत होत असल्याचे प्रशासन सांगत आहे. गावात मोठा फौजफाटा लावलेला आहे. आज धुळे येथून पाचशे तरुण घोषणा देत गावात जाऊन समाजाला भेटण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसांच्या विशेष तुकड्या गावाच्या बाहेर तैनात केलेल्या आहेत त्यांनी आडून कार्यकर्त्यांची समजूत काढून परत पाठवले आहे. राज्यभर या बहिष्काराची चर्चा आहे पण मुख्यमंत्री यांना याबद्दल माहित नाही असच ते भासवत आहेत.