राष्ट्रीय

जिभेने फारशी, लघवी चाटायला लावली, आदिवासी महिलेचा आठ वर्ष डांबून छळ केला! भाजपच्या महिला नेत्याचे अमानवीय कृत्य!!

झारखंड : भाजपच्या महिला नेत्या सीमा पात्रा या महिलेने आदिवासी समाजाच्या 29 वर्षीय सुनीता खाखा नामक महिलेला रांचीमधील घरात 8 वर्ष डांबून ठेवले. या घटनेचे पडसाद देशभर उमटलेले आहेत. आदिवासी महिलेचा हा छळ मानवतेला काळीमा फासणारा आहे.

आदिवासी खाखा नामक महिलेला स्वतच्या घरात डांबून ठेवून तिला जिभेने फारसी साफ करायला लावली, लघवी विष्ठा चाटायला लावली. रॉडने दात तोडणे, गरम तव्याने चेहरा भाजणे असे अमानवी अत्याचार त्यांच्यावर केलेत.

सीमा पात्रा भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्य होती घटनेनंतर भाजपने तिला निलंबित केले आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी या घटनेचा निषेध केला असून आदिवासी समूहाला समूळ नष्ट करण्याचा हा अजेंडा आहे. देशभर आदिवासी दलितांच्या महिला मुली घरकामाच्या नावाखाली गुलाम केल्या जात आहेत. त्यांचे आयुष्य उध्वस्त केले जात आहे. त्यांचं शारीरिक शोषण सुद्धा या माध्यमांतून होत आहे. केंद्र सरकारने अशा महिला मुलीचा शोध घेतला पाहिजे. गरीब दलित आदिवासी महिला गायब आहेत, त्यांचा तपास लागला पाहिजे. भाजप एकीकडे आदिवासी राष्ट्रपती केल्याचं ढोंग करते तर दुसरीकडे आदिवासी महिलेला लघवी चाटायला लावते. एवढ्या मोठ्या पदावरील जबाबदार महिला नेत्या असं कशा वागू शकतात. मानवी हककांची ही हत्या आहे, महिला आयोग उद्धवस्त झाल्याचे संकेत आहेत. आदिवासी महीलाची ही अवस्था विषमतेतून झालेली आहे. झारखंड मुख्यमंत्री आदिवासी गैर भाजपा आहे त्याचा तर हा राग नाही ना? सीमा पात्रा ला अटक का झालेली नाही? केंद्र सरकारने पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये. नुपूर शर्माला पाठीशी घातले तसे या सीमा ला पाठीशी घालू नये.

या घटनेचे देशभर पडसाद उमटत आहेत. या सरकारकडे आदिवासी, दलितांचे संरक्षण करण्याची कसलीच योजना नाही धोरण नाही. अमृत महोत्सव सुरू आहे सगळे पेढे वाटले गेले, आदिवासी महिलेला विष्ठा चाटायला दिली. अशावेळी स्वतंत्रता प्रश्नचिन्ह कायम आहे. भारतीय समाज व्यवस्था आदिवासी दलितांना मुख्य प्रवाहात येऊच देत नाही त्यांना गुलाम ठेवणे हाच त्यांचा अजेंडा असतो. असे केदार यांनी सांगितले.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!