चळवळ

भोकरदन ला निळा आक्रोश मोर्चा; रत्नदीप भांबळे हत्याकांड तीन महिने झालं तरी आरोपी मोकाट!

जालना : ऑल इंडिया पँथर सेना 26 एप्रिल 2023 ला सकाळी 11वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हा उपविभागीय कार्यालय, भोकरदन येते निळा आक्रोश मोर्चा काढणार असून त्याचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार करणार आहेत.

राज्यात दलित अत्याचाराने थैमान घातले असून दलित तरुणांच्या हत्या खुलेआम केल्या जात असून आरोपी मोकाट फिरत आहेत. भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे या गावातील बौध्द तरुण रत्नदीप भांबळे हा शिक्षक होता अतिशय हुशार होता. तीन महिन्यांपूर्वी या शिवारात एका शेतात त्याची हत्या करून त्याला विहिरीत फेकल्याची हादरून टाकणारी घटना घडली. यातील आरोपी अद्याप मोकाट आहेत, देशाच्या राजकीय पुढाऱ्यांच्या इशारा वरुन हा तपास पुढे जात नसल्याचे चित्र जाणवायला लागले आहे.

त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये संताप पसरला आहे. दिवसाढवळ्या आरोपी जर खून करून मोकाट असतील तर येते येणाऱ्या काळात पोलिसांचा कायद्याचा धाक राहणार नाही. तीन महिने दलित तरुणाच्या हत्येचा तपास लागत नसल्यामुळे अखेर ऑल इंडिया पँथर सेनेनी लढण्याचे अस्त्र उचलले असून आता जन आंदोलन शिवाय प्रयाय नाही म्हणत निष्क्रिय अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, आरोपींना अटक करावी, सीआयडी मार्फत चौकशी करावी, पीडितांना संरक्षण द्यावे अशा अनेक मागण्यांसाठी मोर्चा धकडणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष रवी सदावर्ते, तालुका अध्यक्ष किशोर शेजवळ यांनी दिली आहे. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सामील व्हावे असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!