चळवळ

भोकरदन दलित तरुणाचे हत्याकांड; भर उन्हात दिपक केदार यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा!

जालना : पिंपळखेडा भोकरदन येतील भांबळे या शिक्षक दलित तरुणाचे हत्याकांड होऊन तीन महिने झालं तरी आरोपी अटक झालेले नाहीत. पीडित कुटुंबाने गावातील जातीयवादी प्रवृत्तीच्या पाच जणांचे नाव दिले आहेत. आंब्याच्या झाडाखाली मारून त्याला बाजूच्या विहिरीत फेकण्यात आले. अतिशय निर्घृण पणे हत्यकांड झाले असून त्याचा तपास लागत नाही. आरोपीला राजकीय दबावातून पाठीशी घातले जात असल्याचा आरोपी दिपक केदार यांनी केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन असा दोन किलोमिटर अंतरावर आक्रोश करत हा मोर्चा धडकला यात हजारों महिला, तरुणांचा समावेश होता. पीडित आई रडत रडत मोर्चाच्या समोरील बाजूस चालत होती. त्याचे अश्रू अनावर झाले होते. माझ्या मुलाला न्याय द्या म्हणून त्या रडत होत्या.

विजय भांबळे यांच्या भावाने अचानक आत्मदहनचा प्रयत्न केला : दिपक केदार यांचे भाषण सुरू असताना अचानक “पेट्रोल कँड” घेऊन भावाने ओतून घेण्याचा प्रयत्न केला, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला हा आक्रोश प्रशासनाच्या लक्ष्यात कधी येईल? न्याय मिळत नाही म्हणून आत्मदहनाची वेळ यावी.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दलित हत्याकांडातील पीडितांना भेटायला कमीपणा वाटतो का? ऑल इंडिया पँथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी आपल्या प्रतिक्रियेतून खडे बोल सुनावले. भोकरदन केंद्रीय मंत्र्याचे गाव आहे त्यांच्याच घरात आमदार खासदार आहेत. त्यांच्या गावात दलित तरुणांचे हत्याकांड होतात,तीन महिने आरोपी मोकाट असतात. रडणाऱ्या आईला जाऊन त्यांना भेटाव वाटलं नाही. त्यांना आमच्या दलितांच्या घरी येण्यास कमी पणा वाटतो का?

तात्काळ गृहमंत्र्यांनी भूमिका घेतली नाही तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही! राज्यभर दलितांच्या कत्तली सुरू असताना तीन तीन महिने आरोपी अटक होत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी काहीच केले नाही, त्यांनी आता गंभीर व्हावं असे आमचे हत्याकांड होत असताना त्यांनी भूमिका घ्यावी अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही अशा इशारा दिपक केदार यांनी दिला.

आरोपीला अटक करावी, डीवायएसपी चे निलंबन करावे, प्रकरण सीआयडी कडे वर्ग करावे, पीडितांना न्याय द्यावा, सुरक्षा द्यावी इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा होता. उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन व्यथा मांडण्यात आल्या.

या मोर्चाचे आयोजक भोकरदन तालुक्याचे अध्यक्ष किशोर शेजुळ, वैशाली बोर्डे, अनिकेत जाधव शेकडो कार्यकर्त्यांनी या मोर्चाचे आयोजन केले.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!